शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सरकार जास्त काळ टिकणार नाही: लोणीकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 14:31 IST

मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे.

मुंबई : मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड आणि उजनी धरणातून लातूर शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या घोषणेचे काय होणार याची चिंता लातूरकरांना लागली आहे. तर उजनी धरणातून लातूरसाठी पाणी मिळणारी योजना बंद केल्यास हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

लातूर येथे पत्रकारांशी बोलताना लोणीकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला उजनीचे पाणी देण्याची घोषणा केली. बोगद्यातून पाणी आणण्याचा निर्णय सुद्धा झाला. त्या कामाचे डिझाईन तयार झाले. मात्र या सरकराने हे काम थांबवल असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला.

तर लातूरच्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतीला पाणी देणं गरजेचे आहे. त्यामुळे लातूर येथील पाणी पुरवठ्याचा विचार करून आणि नेहमीची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनीचे पाणी आणण्याची योजना थांबवू नये अशी सरकारला विनंती आहे. त्यांनी जर हे काम थांबवलं, तर हे सरकार फार काळ चालणार नाही, असा खोचक टोला लोणीकर यांनी सरकाराला लगावला.

तसेच ह्या सरकारनं हे काम थांबवलं तर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर ही योजना आम्ही पूर्ण करू असेही लोणीकर म्हणाले. लातूर येथे झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.