शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडी २५ टक्के जागांवर एकमेकांविरोधात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 06:32 IST

नांदेड, परभणीच्या सभेत विरोधकांवर टीका, इंडिया आघाडीकडे चेहराच नाही. त्यामुळे हा देश कुणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसत आहेत. 

शिवराज बिचेवार/ज्ञानेश्वर भालेनांदेड/परभणी : इंडिया आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीअगोदरच आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे काही जणांनी लोकसभेच्या रिंगणातून पळ काढत राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश केला आहे. देशातील जवळपास २५ टक्के जागांवर इंडिया आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तेच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करीत आहेत. ४ जूननंतर तर ते एकमेकांचे कपडे फाडतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या नांदेड, परभणी येथे शनिवारी सभा झाल्या. “सर्वांना माझा नमस्कार, २६ एप्रिलची तयारी झाली ना? असा सवाल करीत मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली.  यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीशमहाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. 

शंकररावांकडून शिकण्याचा प्रयत्नपंतप्रधान मोदी यांनी माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आठवण काढली. ते म्हणाले, मी राजकारणात नव्हतो, त्यावेळी पट्टपर्ती येथे सत्यसाईबाबा यांनी शंकरराव चव्हाण यांच्याशी माझी ओळख करून दिली. मला त्यांच्याशी बोलण्याचे सौभाग्य मिळाले. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या व्यक्तीतील नम्रता बघून मी प्रभावित झालो.

महादेव जानकर हे माझे लहान भाऊमतदाराला साद घालताना मोदी म्हणाले, तुमचे स्वप्न माझे संकल्प असून, परभणीसह मराठवाड्याचा विकास व्हावा, या उद्देशाने आगामी काळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. त्यात निश्चितच परभणीला न्याय मिळेल. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत, त्यांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे.

मराठवाड्याच्या विकासात काँग्रेसने घातला खोडापरभणी येथील सभेत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मराठवाड्याच्या विकासाच्या प्रक्रियेत काँग्रेसने सातत्याने खोडा घातल्यामुळेच मराठवाडा आजही मागासलेलाच राहिला. आम्ही मराठवाड्याला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी जलयुक्त शिवारसह वॉटर ग्रीडसारख्या काही महत्त्वपूर्ण योजना अमलात आणल्या होत्या; पण काँग्रेससह त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर पक्षांनी या योजना बंद करून मराठवाड्यावर एकप्रकारे अन्याय केला.

इंडिया आघाडीकडे चेहराच नाही. त्यामुळे हा देश कुणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसत आहेत.  काँग्रेसच्या साहिबजाद्यांना तर वायनाडमध्येही संकट दिसत आहे. त्यामुळे ते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. नुकतेच साहिबजाद्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सुनावले. त्यांना परंपरागत अमेठीतून बाहेर पडावे लागले, वायनाड सोडावे लागले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४parbhani-pcपरभणीnanded-pcनांदेड