शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन लाखांची, पीक कर्ज १५ हजारच का?

By admin | Updated: June 17, 2015 03:37 IST

शेतकऱ्यांची जमीन लाखो रुपये किमतीची असताना त्यांना पीककर्ज एकरी १५ हजार रुपयांच्या आतच दिले जाते. बँक लाखो रुपये

अकोला : शेतकऱ्यांची जमीन लाखो रुपये किमतीची असताना त्यांना पीककर्ज एकरी १५ हजार रुपयांच्या आतच दिले जाते. बँक लाखो रुपये किमतीची शेतकऱ्यांची शेती गहाण ठेवत असताना, कर्ज मर्यादेत वाढ का करण्यात येत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो.प्रत्येक बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची मुदत ठरवून दिली आहे. विदर्भात कोरडवाहू शेतीसाठी सर्वच बँकांच्या वतीने २० हजार रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज एका एकराकरिता देण्यात येत नाही. एकरी पाच ते दहा लाख रुपये किंमत असलेली शेती शेतकरी बँकेकडे गहाण ठेवतात. त्यांना पीक कर्ज मात्र १५ हजारांच्या आतच दिले जाते. कर्जासाठी शेती गहाण ठेवूनही त्यांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. कर्जाचे प्रस्ताव तयार करावे लागतात, त्यामध्येही त्रुटी काढण्यात येतात. सात-बारा, आठ अ, सहा अ, हैसीअत दाखला, मुद्रांक मागण्यात येतात. यामध्येच शेतकऱ्यांचे शेकडो रुपये खर्च होतात, तसेच नाहक मानसिक त्रासही सहन करावा लागतो. राष्ट्रीयीकृत बँका १५ हजार रुपये कर्ज देत असल्या तरी खासगी बँक, जिल्हा बँक आणि सोसायट्या त्यापेक्षाही कमी कर्ज देतात. कर्ज पुनर्गठनाचे आदेश धडकल्यानंतर सहकारी सोसायट्या व जिल्हा बँक शेतकऱ्यांना एकरी सहा ते सात हजार रुपयेच पीक कर्ज देत आहे. सिंचनाची व्यवस्था असली तर फळबांगासाठी जास्त कर्ज दिले जाते; मात्र विदर्भात फळबागांची संख्या अत्यल्प आहे. विदर्भात केवळ १२ टक्के शेती सिंचनाखाली आहे. उर्वरित ८८ टक्के शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे जास्त कर्ज घेण्याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच होतो. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात भेदभाव -पीक कर्ज वाटपात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात भेदभाव करण्यात येतो. पश्चिम महाराष्ट्रात फळबागांच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखो रुपये कर्ज दिले जाते; विदर्भात मात्र शेतकऱ्यांना १५ हजाराची मर्यादा आहे. कोरडवाहू शेतीचे कारण सांगून त्यांना शेतीच्या किमतीच्या तुलनेत कर्ज दिले जात नाही. -पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणात फळबागांकरिता पीक कर्ज दिले जाते, त्या प्रमाणात विदर्भातील फळबागांकरिता कर्ज दिले जात नाही. बियाणे, खत, फवारणीच्या औषधांच्या किमती प्रचंड वाढल्या असून, मजुरीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पीक घेण्याकरिता वर्षभरात हजारो रुपये खर्च येतो. त्या तुलनेत शासन पैसे देत नाही. बँकांकडे शेती गहाण ठेवण्यात येत असल्याने दुसरीकडून कर्जही मिळत नाही. - उत्तर प्रदेशसह देशातील अन्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांना १० लाखांपर्यंतच्या पीक कर्जाकरिता मुद्रांकाची सूट दिली जाते. महाराष्ट्रात मात्र पीक कर्ज हवे असल्यास शेतकऱ्यांना सरसकट मुद्रांकाचा खर्च करावा लागत आहे. शासन शेतकऱ्यांबाबत गंभीर असेल, तर महाराष्ट्रातही दहा लाखांच्या पीक कर्जाकरिता मुद्रांकात सूट देण्याची गरज आहे.