शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत फक्त चर्चा; अद्याप निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:42 IST

अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

मुंबई : राज्यात ९वी ते १२वीच्या तब्बल ७० टक्के शाळा सुरू झाल्यानंतर नवीन वर्षात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील चर्चा शासन स्तरावर सुरू झाली आहे. मात्र अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या काेराेना चाचण्या, शाळांची स्वच्छता, वर्गांचे नियोजन यांचे नियाेजन करावे लागणार असल्याने अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एससीईआरटीच्या माहितीप्रमाणे सध्या राज्यात नववी ते बारावीचे एक लाखाहून अधिक विद्यार्थी वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. मात्र पाचवी ते आठवीचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा लहान असल्याने शाळा सुरू झाल्यावर त्यांचे आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घ्यावी लागेल.

सद्य:स्थितीत नववी ते बारावीच्या वर्गांची उपस्थिती केवळ चार तासांची आणि ५० टक्के इतकीच आहे. त्याचप्रमाणे पहिली ते आठवीच्या वर्गांचे नियोजन करावे लागेल. सुरुवातीला विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कमीतकमी वेळ ठेवावी लागणार असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल. शासन स्तरावर याबाबतीत चर्चा सुरू असून आढावा घेतला जात आहे, असे सोळंकी यांनी सांगितले.

पालकांकडून घ्यायच्या संमतीपत्रावरून गाेंधळ
अनेक जिल्ह्यांत शिक्षणाधिकाऱ्यांकडून पालकांकडून घ्यायच्या संमतीपत्राचा नमुना पाठविला जात असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये गाेंधळ आहे. सही करायची कशी, मुलांच्या सुरक्षेचे काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. शिक्षकांच्या चाचण्या, शाळांची स्वच्छता, तासिकांचे नियोजन यासंदर्भातील मार्गदर्शन सूचनांशिवाय व्हायरल होत असलेल्या या मेसेजेसमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतही गोंधळाचे वातावरण आहे.