शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"जनतेचा कल अन् मताधिक्य पाहिल्यास मविआच्या मागे राज्यातील जनता उभी राहिली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 20:22 IST

अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान पार पडलं, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला आहे. बरेच उमेदवार आघाडीवर आहेत. निकाल लागायला रात्री उशिर होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंडवरच असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला आहे. त्यात अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं त्यांनी सांगितले. 

तर कोकणात बाळाराम पाटील यांच्यासारखा चांगला उमेदवार पराभूत झाला. त्याची कारणे जगजाहीर आहेत. प्रचंड धनशक्तीपुढे सरळमार्गी बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नाही परंतु लोकांच्या मनात बाळाराम पाटीलच आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असंही जयंत पाटील म्हणाले. पाच जागांपैकी चार जागांवर  महाविकास आघाडी आज पुढे आहे हे फार मोठे असे यश आहे. सत्तारुढ पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र आहे हे समोर आले आहे. मागच्या साडेतीन वर्षात महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने सत्तेत असो अथवा नसो उचलून धरले आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे जयंत पाटील यांनी आभार मानले. 

सर्व्हे खरा ठरला!इंडिया टूडेचा जो सर्व्हे आला होता तो खरा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती या निवडणूक निकालावरून आली आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये आमची महाविकास आघाडी पुढे आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनीदेखील महाविकास आघाडीला कौल दिला आहे. महाराष्ट्रात धोका देण्याचे जे काम झाले ते महाराष्ट्राने मान्य केलेले नाही. महापुरुषांचा अपमान करण्याचे काम महाराष्ट्रात सातत्याने सत्तारुढ पक्षाकडून व मंत्री आणि राज्यपालांकडून झाला ते महाराष्ट्राने सहन केलेले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामागे महाराष्ट्र ठामपणाने उभा आहे हे यावरून सिद्ध झाले आहे असं जयंत पाटलांनी सांगितले. 

नाशिकमध्ये भाजपा द्विधा मनस्थितीत नाशिकमध्ये भाजपला उमेदवार उभा करता आला नाही. उभा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीत होते. तर दुसरीकडे कॉंग्रेसवतीने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली गेली होती. उमेदवारी भरताना थोडासा गोंधळ झाला. त्यानंतर सत्यजित तांबे हे उमेदवार म्हणून लोकांसमोर गेले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यात भाजपचा रोल राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या विचाराची लोकं महाराष्ट्रात दिसून आली आहेत असा टोला जयंत पाटलांनी भाजपाला लगावला.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा