शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सीबीआय, सीआयडीला उच्च न्यायालयाने घेतले फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 6:17 AM

दाभोलकर, पानसरे हत्या; खटल्यास विलंब होत असल्याने व्यक्त केली चिंता

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्र्रकरणी खटला चालविण्यास विलंब होत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली. या विलंबामुळे न्यायदानामध्ये ‘अपयश’ येऊ नये, असे म्हणत उच्च न्यायालयाने सीबीआयसह सीआयडीलाही फैलावर घेतले.

दाभोलकर यांची हत्या होऊन सात वर्षे तर पानसरे यांची हत्या होऊन पाच वर्षे उलटली तरीही पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणा अद्याप फरार मारेकऱ्यांच्या शोधात आहे. तर, दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे शोधत आहेत, असे न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. आर.आय. छागला यांच्या खंडपीठाने उपरोधिकपणे म्हटले. ‘आरोपींवर लवकरात लवकर खटला भरवणे आवश्यक आहे. विलंबामुळे पीडित व्यक्तींच्या कुटुंबासाठी आणि अटक आरोपींसाठीही न्यायदानात अपयश यायला नको. आरोपींनाही मूलभूत अधिकार आहेत,’ असे न्यायालयाने म्हटले.

दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही हत्यांचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर गुरुवारी सुनावणी होती. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करत आहे, तर पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य सीआयडी करत आहे. त्यासाठी एसआयटी नेमली आहे. ‘फौजदारी गुन्हे न्यायप्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायप्रणालीवरचा लोकांचा विश्वास उडू नये. खटल्यास विलंब होणे, योग्य नाही. कायद्या एखाद्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत तो निर्दोष आहे, असे समजण्यातयेते. त्यामुळे त्या आरोपीला अनिश्चित काळासाठी कारागृहात डांबता येणार नाही,’ असे उच्च न्यायालयाने सांगितले. तसेच पानसरे, दाभोलकर या दोन्ही हत्यांप्रकरणी खटला कधी सुरू करण्यात येणार, याची माहिती २४ मार्चपर्यंत द्यावी, असे निर्देश सीबीआय व सीआयडीला दिले.सीबीआयने मागितली एक महिन्याची मुदतडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वापरलेले शस्त्र मारेकऱ्यांनी ठाण्याच्या खाडीत फेकले. ते शोधण्यासाठी परदेशी पाणबुड्यांचा वापर करण्यात आला. ही शोधमोहीम सुरू असून शस्त्र शोधण्यासाठी महिनाभराची मुदत द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाला केली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागHigh Courtउच्च न्यायालय