शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:31 IST

मंगळवारी रात्री व दिवसा जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर येऊन मार्ग बंद पडले.

अनेक मार्ग बंद : शहरातील सखल भाग जलमय; कुरखेडा, भामरागड, आरमोरी, कोरचीत अतिवृष्टी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मंगळवारी रात्री व दिवसा जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर येऊन मार्ग बंद पडले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभरात सरासरी ५३.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोरची, आरमोरी, कुरखेडा, भामरागड या तालुक्यात झाला. मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. पहाटे व सकाळी मूसळधार पाऊस झाला. त्यानंतर दुपारच्या सुमारास थोडीफार उसंत दिली. त्यानंतर आणखी ४ वाजतानंतर मूसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. या पावसामुळे दुर्गम भागातील नाले व नद्यांवरील ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक मार्ग बंद पडले. गडचिरोली - तालुक्यातही दमदार पाऊस झाला. शहरातील कन्नमवार वार्ड, विवेकानंद नगरात पाणी साचले. नगर परिषदेच्या प्रांगणातही पाणी साचल्याने नगर परिषदेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. धानोरा - तालुक्यातील धानोरा-येरकड-मालेवाडा मार्गावरील इरूपधोडरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग पहाटे ५ वाजतापासून बंद झाला. उपदली ते खामतळा मार्ग रात्रीपासूनच बंद आहे. इरूपढोडरी मार्गावरील मुस्काजवळील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर पोहोचले. जयसिंगटोला येथील मडावी यांच्या घराजवळ पुराचे पाणी जमा होण्यास सुरूवात झाल्याने त्याला घर सोडण्याचे आदेश तलाठ्यांनी दिले. धानोरा तालुक्यातील सुरसुंडी मार्गही बंद पडला. भामरागड - तालुक्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बोडी, तलाव पूर्णपणे भरले असून मंगळवारी झालेल्या पावसामुळे पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत पर्लकोटा तुडूंब भरून वाहत आहे. इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास भामरागड शहरातील विश्वेश्वरराव चौकातील घरांना धोका निर्माण झाला आहे. एटापल्ली - तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे तालुक्यात धान रोवणीच्या कामांना वेग आला. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठेंगणे पूल बुडून मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला. आष्टी - परिसरातही मुसळधार पाऊस झाला. मात्र परिसरातील सर्वच मार्ग सुरू होते. वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. आष्टी-गोंडपिपरी मार्गावर वैनगंगा नदीवर ठेंगणे पूल आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर या पुलावरून पाणी वाहते. मात्र मंगळवारच्या पावसाने पुलावरून पाणी चढण्याची शक्यता कमी आहे. जिमलगट्टा - अहेरी तालुक्यातही दमदार पाऊस झाला. जिमलगट्टा परिसरातील देचलीपेठा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील १५ गावांचा संपर्क तुटला आहे. आरमोरी - तालुक्यात सुमारे ९९.८ मिमी पाऊस पडला. सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अनेकांच्या घरात पाणी सुध्दा शिरले. त्यामुळे घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. वैरागड - मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने वैरागड परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला. वैरागड-मानापूर मार्ग बंद पडला. पाठणवाडा नाल्याला पाणी असल्याने वैरागड-कढोली मार्ग बंद पडला. वैरागड-रांगी नाल्यावर कुकडीजवळ नवीन पुलाचे काम झाले. परंतु सदर काम अपूर्ण आहे. पुलाच्या बाजुची माती घसरत असल्याने वैरागड-कुकडी मार्ग अडचणीचा ठरला आहे. देसाईगंज - तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रोवणीच्या कामांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे.