शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन शिवसेनेची टीका

By admin | Updated: August 22, 2015 01:06 IST

देशातील शेतकऱ्यांबाबत जेवढे काम व्हायला हवे होते तेवढे झालेले नाही, अशी टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते अरविंद सावंत यांनी केली.

मुंबई : देशातील शेतकऱ्यांबाबत जेवढे काम व्हायला हवे होते तेवढे झालेले नाही, अशी टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते अरविंद सावंत यांनी केली.जमीन संपादन कायद्यात शेतकऱ्यांच्या पूर्वसंमतीची अणि सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्याची तरतूद करण्याची शिवसेनेची मागणी मान्य झाली असल्याचे सावंत यांनी सांगितले. देशात सर्वप्रथम कर्जमुक्तीची मागणी शिवसेनेने केली व तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ती जनमताच्या दबावाखाली मान्य करावी लागली, असेही ते म्हणाले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने सावंत यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सावंत म्हणाले की, पाकिस्तानबरोबर कुठल्याही स्वरूपाची चर्चा करण्यास शिवसेनेचा विरोध कायम आहे. केंद्रात रालोआ सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समझोता एक्स्प्रेस सुरू केली तेव्हाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला विरोध केला होता. भारताबरोबर सौहार्दपूर्ण संबंधाची चर्चा सुरू असतानाच कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे पाकिस्तानशी कुठलीही चर्चा करणे निष्फळ आहे, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)