शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय शुल्क समित्या स्थापन, पालक करू शकणार तक्रार पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 05:41 IST

शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या ५ विभागीय समित्यांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असून, सनदी लेखापालांची नियुक्ती केली आहे.

मुंबई : राज्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या शुल्कावरून शाळा प्रशासन व पालकांमध्ये वारंवार वाद निर्माण होतात. यावर कायदेशीर व विनाविलंब तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ पारित करून राज्यातील ८ शैक्षणिक विभागांसाठी ८ विभागीय समित्या व राज्यस्तरावर एक पुनरीक्षण समिती स्थापन करण्यात येणार हाेती. मात्र, आतापर्यंत त्या अस्तित्त्वात नसल्याने पालकांना शुल्क वाढीबाबत दाद मागता येत नव्हती. त्यानंतर आता शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी या विभागीय समित्यांची कार्यवाही साेमवारी पूर्ण केली. मात्र, अनेक पालक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांनी केवळ कागदी घोडे नाचवून पालकांच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचा आरोप केला.

शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या ५ विभागीय समित्यांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असून, सनदी लेखापालांची नियुक्ती केली आहे. सनदी लेखापालांच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पालकांना ज्या शाळांनी शुल्कवाढ केली आहे, त्यांच्याविरोधात विभागीय स्तरावर तक्रार करता येईल. मात्र, शुल्क नियंत्रण कायद्यात असलेल्या त्रुटींमुळे शिक्षण विभागाने पालकांना फसविल्याचा दावा इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशन या संघटनेने केला. 

कारण शुल्कवाढीची तक्रार एकटा पालक  करू शकणार नाही. यासाठी किमान २५ टक्के पालकांची साथ असणे आवश्यक आहे. तसे झाले तरच तक्रारीची दखल घेतली जाईल. त्यामुळे या त्रुटी दुरुस्त होणार नाहीत तोपर्यंत विभागीय समित्यांचा पालकांना काहीच उपयोग नसल्याची प्रतिक्रिया या संघटनेच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी दिली.तर, अंमलबजावणी याेग्य प्रकारे हाेणार नसेल तर त्यांचा उपयोग पालकांना निश्चितच होणार नाही. मग समित्यांच्या नावाखाली हे पांढरे हत्ती कशासाठी पोसायचे, असा खोचक सवाल  पालक, शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते प्रसाद तुळसकर यांनी केला आहे.

शिक्षण शुल्क कायद्यातील काही त्रुटी- शुल्कवाढ करू नये असे म्हटले, मात्र शुल्कवाढ केल्यास कारवाई काय करणार हेच नमूद केले नाही.- शुल्कवाढ केल्यास २५ टक्के पालकांनी त्याला विरोध केला, तरच तक्रार दाखल होऊ शकते.- शाळांचा वार्षिक आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ते न केल्यास काय कारवाई हे स्पष्ट नाही.

टॅग्स :Educationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाड