शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

व्होट जिहादमुळे भाजपला फटका बसल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा; आकडेवारीत वेगळीच माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:43 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या व्होट जिहादच्या दाव्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीतून वेगळी माहिती समोर आली आहे.

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. अशातच गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत व्होट जिहादचा उल्लेख केला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ जागांवर फडणवीस यांनी व्होट जिहाद झाल्याचं म्हटलं होतं. मात्र आता लोकसभा निवडणुकीत महायुतीला व्होट जिहादचा सामना करावा लागला का याची आकडेवारी समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा व्होट जिहादचा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पराभवासाठी व्होट जिहादला जबाबदार धरले. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविरुद्ध एकत्रित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा दावा देवेंद्र फडणीवस यांनी केला होता. मात्र आता मतदानाची आकडेवारीतून वेगळीच माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांचा मोठा भाग असलेल्या ३८ विधानसभा मतदारसंघातल्या अर्ध्याहून अधिक जागांच्या मतदानात वाढ झाल्याचे समोर आलं आहे. 

महायुतीची मुस्लिम मते वाढली

मतमोजणीच्या आकडेवारीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यापेक्षा वेगळी माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुतीला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा मोठा भाग असलेल्या ३८ विधानसभा मतदारासंघापैकी निम्म्याहून अधिकांमध्ये जास्त मते मिळवली आहेत. २० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले महाराष्ट्रात विधानसभेचे ३८ मतदारसंघ आहेत. यापैकी २० मतदारसंघात भाजप आणि मित्रपक्षांची लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवल्याचे आकडेवारीतून समोर आलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा जागांपैकी या ३८ मतदारसंघांमध्ये मुस्लिम लोकसंख्या २० टक्के आहे. त्यातील नऊ मतदारसंघामध्ये  ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण ११.२४ कोटी लोकसंख्येपैकी १.३ कोटी मुस्लिम आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या ३८ जागांपैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ११ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन आणि समाजवादी पार्टीने एआयएमआयएमने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.

या ३८ जागांवर मुस्लिम नागरिकांची संख्या जास्त असूनही, सध्याच्या विधानसभेत असलेल्या एकूण १० मुस्लिम आमदारांपैकी फक्त आठच या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या १० मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि सपा यांनी प्रत्येकी दोन जागा तर एआयएमआयएम आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांनी महायुतीच्या विरुद्ध मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणाचा फटका बसल्याचे म्हटलं. याला भाजप नेत्यांनी व्होट जिहाद असे म्हटलं होतं.

महत्त्वाची बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार असलेल्या ३८ पैकी २० विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या रावेरमध्ये भाजपची सर्वाधिक २०.१३ टक्के मते वाढली आहेत. दुसरीकडे, मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, छत्रपती संभाजीनगर मध्य, अकोट, परभणी आणि बीड या मतदारसंघामध्ये महायुतीच्या मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी घटली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुका वगळता भाजपने महाराष्ट्रात सर्व जागा लढवल्या तेव्हा ३८ मुस्लिमबहुल मतदारसंघांकडे फारसे लक्ष दिले नाही. २०१९ मध्ये भाजपने  ३८ पैकी फक्त १८ जागा लढवल्या आणि उरलेल्या शिवसेनेसह मित्रपक्षांना सोडल्या होत्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuslimमुस्लीमlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४