शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

Coronavirus Lockdown: राज्यात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 1:25 PM

राज्यात कोरोना संक्रमक रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावला आहे. त्याचसोबत नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्येत घट होताना दिसत नाही.

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३ आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती भयंकर होऊ लागली आहे. दिवसाला राज्यात ५० हजारांपेक्षा कोरोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा होऊ शकते.

राज्यात कोरोना संक्रमक रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावला आहे. त्याचसोबत नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्येत घट होताना दिसत नाही. अशातच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत.

महाराष्ट्रात ३ आठवड्यांसाठी लॉकडाऊन

राज्य सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३ आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वीकेंड लॉकडाऊनने काही होणार नाही. संक्रमण रोखण्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलणं गरजेचे आहे. त्याचसोबत राज्यात आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी पदवीत्तर करणाऱ्या ५ लाख डॉक्टरांनाही सेवेत घेण्याबाबत आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, कम्युनिटी स्तरावर संक्रमण पसरणे आणि लोकांचे मृत्यू रोखण्यासाठी ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी यावर निर्बंध आखायला हवेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री या नात्याने मी फक्त वीकेंड लॉकडाऊन नको तर ३ आठवड्यापर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावावा अशी मागणी करतो. कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

सर्वपक्षीय बैठक  

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी राज्यात MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही बैठकीत निर्णय झाला आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्यापूर्वी छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे असं प्रविण दरेकर म्हणाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे