“हा अर्थसंकल्प २०२६ चा होता की २०४७ चा?”; विजय वडेट्टीवारांची सरकारवर उपरोधिक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:46 IST2026-03-06T16:43:38+5:302026-03-06T16:46:43+5:30

Congress Vijay Wadettiwar On Maharashtra Budget 2026: तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

congress vijay wadettiwar said was this maharashtra budget for 2026 or 2047 | “हा अर्थसंकल्प २०२६ चा होता की २०४७ चा?”; विजय वडेट्टीवारांची सरकारवर उपरोधिक टीका

“हा अर्थसंकल्प २०२६ चा होता की २०४७ चा?”; विजय वडेट्टीवारांची सरकारवर उपरोधिक टीका

Congress Vijay Wadettiwar On Maharashtra Budget 2026: विधानसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा होता, यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीका विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी  टोला लगावला.

या अर्थसंकल्पातील मुख्य त्रुटींवर बोट ठेवताना विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि MMR क्षेत्रासाठी असल्यासारखा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्पष्टता नाही, अस वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांची निराशा झाली आहे

२०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा राज्यावर २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते, पण आज हे कर्ज वाढले आहे.हे सरकार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा याही वेळी करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारच्या या धोरणावर उपरोधिक टिप्पणी करताना वडेट्टीवार म्हणाले की, तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!

 

Web Title : बजट 2026 का या 2047 का? वडेट्टीवार की सरकार पर कटाक्ष।

Web Summary : विजय वडेट्टीवार ने महाराष्ट्र के बजट को अवास्तविक बताया, जिसमें मुंबई और एमएमआर को प्राथमिकता दी गई है, किसानों और ग्रामीण क्षेत्रों की उपेक्षा की गई है। उन्होंने सरकार पर कर्ज बढ़ाने और ठेकेदारों को लाभ पहुंचाने का आरोप लगाया।

Web Title : Budget 2026 or 2047? Wadettiwar's sarcastic criticism of government.

Web Summary : Vijay Wadettiwar criticized Maharashtra's budget as unrealistic, favoring Mumbai and MMR, neglecting farmers and rural areas. He accused the government of increasing debt and benefiting contractors.