शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:43 IST

भाजपने देखील मराठा आरक्षणाचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारचा आरक्षणाचा निर्णय अवैध ठरवला होता. परंतु, भाजपने योग्य पाठपुरावा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला.

- रवींद्र देशमुख

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाकडून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला काही दिवसांपूर्वीच यश आले. अनेक संघटना, पक्ष आणि युवकांचे बलिदान यांच्या लढ्यामुळे मराठा आरक्षणाला अंतिम स्वरुप आले. भाजप सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला. त्यावरून भाजपचे आणि मुख्यमंत्र्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. परंतु, मराठा आरक्षणाचे जन्मदाते म्हणून आघाडी सरकार अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीच असल्याचे समोर आले आहे.

मागील २५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचे घोंगड भिजत ठेवण्यात आलं होते. परंतु, आता हा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघाला आहे. भाजपचे राज्यात सरकार असल्यामुळे मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय भाजपला देण्यात येत आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आले. तर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती. इतर मंत्र्यांचे देखील सत्कार समारंभ पार पडले. मात्र या आरक्षणाचे निर्माते आधीचे सरकारच असल्याचे समोर आले आहे.

मराठा आरक्षण न्यायालयात टिकल्यानंतर अनेक ठिकाणी लागू देखील झाले आहे. त्यानुसार मराठा समाजातील मुलांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील वैभव देवनाथ ढेंबरे या युवकाला मराठा जातीचे पहिले प्रमाणपत्र देण्यात आले. वैभव या युवकाला दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्रावर आघाडी सरकारने आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरची दिनांक नमूद केलेली आहे. आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. त्याला अनुसरून १५ जुलै २०१४ रोजी आघाडी सरकारने जीआर काढला होता. जातीच्या प्रमाणपत्रावर जीआरचा क्रमांक आणि तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे निर्माते खऱ्या अर्थाने आघाडी सरकारच असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील फोटो व्हायरल होत आहेत.

युतीचा पाठपुरावा ठरला महत्त्वाचा

आघाडी सरकारने अखेरच्या काळात मराठा आरक्षण दिले होते. त्याचा निवडणुकीत लाभ होईल, असा विश्वास राज्यातील नेत्यांना होता. परंतु, २०१४ मध्ये राज्यातही पक्षांतर झालं. त्यामुळे आरक्षणचा मुद्दा युतीकडे आला. भाजपने देखील मराठा आरक्षणाचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारचा आरक्षणाचा निर्णय अवैध ठरवला होता. परंतु, भाजपने योग्य पाठपुरावा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला.