शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:06 IST

Jayant Patil NDA Government : धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले.

Maharashtra Vidhan Sabha election 2024 : "भाग्यश्री ताई चिंता करू नका. तुम्हाला तुमच्या वडिलांनी अंतर दिले असले, तरी शरद पवार साहेब तुम्हाला अंतर देणार नाही. ताकदीने पाठिंबा देतील, हा माझा विश्वास आहे", असे सांगतानाच जयंत पाटील यांनी दिल्लीतील सरकार घालवण्यासाठी भाजपला आणखी धक्का देण्याचे आवाहन केले. भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.    

अहेरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्र आणि भारतातील आदिवासींना आपल्या हक्काची जाणीव झाली आहे. लोकसभेसाठी जेव्हा भाजप तुमच्याकडे मते मागायला आला. तेव्हा तुम्ही त्यांचा कावा ओळखला. या देशात आदिवासींना पंडित नेहरूंपासून विकासासाठी जी संरक्षणे दिली गेली होती. ती आरक्षण असो वा अन्य. ती संरक्षणे काढून घेण्याचा विचार या भाजप करत आहे. या देशाची घटना बदलण्याचे पाप यांच्या मनात आहे. याची खात्री झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपचा पराभव केला." 

विधानसभेला भाजपला धक्का द्यायचा आहे -जयंत पाटील

"नरेंद्र मोदींनी दिल्लीचे सरकार स्थापन केले. दोन राज्यातील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्याने. म्हणून आता विधानसभेत भाजपला आणखी एक धक्का द्यायचा आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात-मुंबईतील त्यांचे सरकार जात नाही, तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात विजयी करण्याची आपली जबाबदारी आहे", असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.  

"...म्हणून भाग्यश्री आत्रामांचा पक्षप्रवेश लांबला", जयंत पाटलांनी सांगितले कारण

भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, "या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आपण विजयी केला. तो उमेदवार भाजपकडे निघालेला. आमच्या भाग्यश्री ताईंनी आणि इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना खेचून मागे आणले आणि आपण त्यांना आमदार केले."

"बाबा मनाने कधीच तिकडे गेले होते. पण, त्यांची मुलगी कधीही भाजपच्या वळचणीला जाऊन बसली नाही. ती त्यांच्यापासून चार हात लांब राहिली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोकं फुटून तिकडे गेले, तेव्हापासून भाग्यश्री ताई आम्हाला आणि पवार साहेबांना सांगत होत्या की, जे चाललंय ते मला मान्य नाही. मला तुमच्याकडेच राहायचे आहे", असे पडद्यामागची गोष्ट जयंत पाटलांनी सांगितली. 

जयंत पाटील म्हणाले, "आम्ही त्यांना सांगितले की, तुमचे वडील तिकडे गेले आहेत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहा. पण, त्या म्हणाल्या मला तो मार्ग पसंत नाही. प्रसंगी मी वडिलांशी संघर्ष करेल, पण महाविकास आघाडीमध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे. आम्हीच चालढकल केली आणि दोन-चार महिने लांबवले. का, तर आम्हाला बघायचे होते की, भाग्यश्री ताई त्यांच्या विचारावर ठाम राहणार आहेत की नाही."

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबई