शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

भुजबळांना गड राखताना होणार दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 4:10 PM

भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढावी लागली. मात्र याच काळात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसनेने नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे.

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढून बाहेर आल्यावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी आपले गड राखण्याचे आव्हान उभे आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवास तोंड द्यावे लागल्यामुळे भुजबळांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. त्यातच भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा भुजबळ यांना अडचणीची जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढावी लागली. मात्र याच काळात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसनेने नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे. विशेष म्हणजे भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला-लासगाव येथे शिवसनेने आपली ताकद वाढवली आहे. त्यातच नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांनी शिवबंधन बांधल्याने सेनेचे पारडे जड झाले आहेत. कधीकाळी भुजबळांच्या ताब्यातील पंचायत समिती आणि नगरपरिषदेतील सत्ता सुद्धा आता सेनेकडे आहे. तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ३ जागा ह्या आता सेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे आपलं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी भुजबळांची कसोटी लागणार आहे.

मतदारसंघात वाढत्या अडचणी लक्षात घेता, भुजबळ औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते लवकरच यासाठी भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. वैजापूर मतदारसंघात ओबीसी मतदार मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे याचा फायदा भुजबळांना होऊ शकतो. मात्र याबाबतीत भुजबळांची कोणतेही अधिकृत प्रतिकिया आतापर्यंत समोर आलेली नाही.

पक्षांतर्गतही अडथळे

मतदारसंघात विरोधकांबरोबर पक्षांतर्गतही भुजबळांसमोर अडथळे आहेत. भुजबळ यांनी विधान परिषदेसाठी पाठवण्याचा शब्द दिला होता, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाहीत म्हणून, नाराज असलेले भुजबळांचे सहकारी माणिकराव शिंदे यांनी येवल्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा रश्मी पालवे यांनी काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास इतर पक्षातून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे.