शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
5
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
6
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
7
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
8
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
9
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
10
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
11
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
12
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
13
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
14
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
15
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
16
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
17
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
18
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
19
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
20
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन

आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 5:52 AM

पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

मुंबई : पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. याआधी सरकारने ५ हजार गावांत दुष्काळ जाहीर केला असून १४ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.राज्यातील दुष्काळी भागांमध्ये राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा गुरुवारी मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पाणी टंचाई असलेल्या आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे.या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांतील शेतकºयांच्या कर्जाची पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दुष्काळ जाहीर झालेली मंडळेधुळे जिल्हा : साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल, दुसाणे, साक्री, कासारे, दहीवेल मंडळांतील ११६ गावे.अहमदनगर जिल्हा : अकोले तालुक्यातील अकोले, वीरगाव, समशेरपूर, कोतुळ, ब्राह्मणवाडा येथील ११६ गावे.जळगाव जिल्हा : एरंडोल तालुक्यातील एरंडोल व रिंगणगावमधील ३६ गावे. तसेच धरणगाव तालुक्यातील धरणगाव, साळवा, पाळधी, पिंप्री, चांदसर येथील ५९ गावे.परभणी जिल्हा : गंगाखेड व जिंतूर तालुक्यातील गंगाखेड, सांगवील बामणी या महसूल मंडळांतील ८० गावे.जालना जिल्हा : मंठा तालुक्यातील मंठा व ढोकसाळ सर्कलमधील ५८ गावे.उस्मानाबाद जिल्हा : उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरुम, नारंगवाडी, मुळज, दाळिंब या मंडळांतील ९६ गावे.सातारा जिल्हा : खटाव तालुक्यातील निमसोड, मायणी, पुसेगाव, बुध, खटाव, औंध, पुसळेवाडी, कातरखटाव या मंडळांमधील १११ गावे.बुलढाणा जिल्हा : बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यांतील बुलढाणा, देऊळघाट, पाडळी, रायपूर, धाड, चिखली, उनद्री, आमडापूर, हातणी, मेरा, महेकर, हिवराश्रम, देऊळगाव मही, जळगाव, जामोद या मंडळांतील २४६ गावे.असा मिळणार दिलासाकर्ज वसुलीला स्थगितीरोजगार हमी योजनेमध्ये१०० दिवसांऐवजी१५० दिवस मजुरीविद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफयापूर्वी घेतलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास विद्यापीठांना सूचना

टॅग्स :droughtदुष्काळ