शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राज्यातील ७ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 1:18 PM

बाजार समिती बरखास्तीचे धोरण

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विषय ऐरणीवरराज्यात ३०७ बाजार समित्या, ६००वर उपबाजारअनेक घटकांच्या जीवनाशी संबंधित बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माणबाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’सारखी नवीन योजना आणून सुधारणा गरजेची

सतीश सांगळे -  कळस : केंद्र शासनाने बाजार समित्या बरखास्त करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र, बाजार समित्या बरखास्त करून शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व राज्यातील सुमारे ७ हजार बाजार समित्यांच्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’सारखी नवीन योजना आणून सुधारणा गरजेची आहे. मात्र, बरखास्त केल्यानंतर कोणती बाजार व्यवस्था अस्तित्वात येणार, याबाबतचे गैरसमज  दूर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.शेतकºयांच्या मालाची लुबाडणूक होऊ नये, त्याच्या मालाला योग्य किंमत मिळावी, किंमत मिळण्यासाठी लिलाव पद्धतीत स्पर्धा व्हावी, शेतकऱ्यांच्या मालाचे पसे मिळण्याची हमी देता यावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९६४ मध्ये करण्यात आला. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी १९६७ मध्ये झाली. या बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकºयांना प्रतिनिधित्व करता आले. अनेक बाजार समित्यांच्या स्वमालकीच्या जागा आहेत, इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, यावर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून बाजार समितीमध्ये विश्वास निर्माण झाला होता.राज्यातील कृषी उत्पन्न बाजर समितीअंतर्गत सेवेत असलेल्या जवळपास ६ हजार ८७७ पेक्षा जास्त कर्मचाºयांना शासनसेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याचा प्रस्ताव काही वर्षांपासून शासनदरबारी धूळ खात आहे. बाजार समित्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांचा शासनसेवेत समावेश करण्याच्या मागणीबाबत काय विचार होणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी, अडते-व्यापारी, कामगार, हमाल, मापारी अशा अनेक घटकांच्या जीवनाशी संबंधित बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे............राज्यात ३०७ बाजार समित्या, ६००वर उपबाजारराज्यात जवळपास ३०७ बाजार समित्या असून ६०० च्यावर उपबाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांमध्ये जवळपास ६ हजार ८७७ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व इतर लाभ हे बाजार समितीच्या उत्पन्नातून दिले जातात. 

टॅग्स :PuneपुणेEmployeeकर्मचारीjobनोकरीGovernmentसरकार