शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यातील धरणांत अवघा ६१ टक्के पाणीसाठा ; पाणी नियोजनाचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 14:56 IST

राज्य यंदा तीव्र जलसंकटाच्या छायेत असून, राज्यात अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा आहे. या साठ्यावरच पिण्यासाठी, शेती आणि उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान राज्य, जिल्हा आणि शहर प्रशासनावर असणार आहे.

ठळक मुद्देगेल्यावर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी पाणीसाठा कमी, मराठवाड्यावर जलसंकट पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ठिकाणची पिके वाया सुमारे दोनशे तालुके दुष्काळाच्या छायेत राज्यातील ३ हजार २६६ लहान मोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमतापुणे आणि कोकण प्रदेशात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगलीयंदा प्रशासनाला योग्य जलनीती राबवावी लागणार

पुणे : राज्य यंदा तीव्र जलसंकटाच्या छायेत असून, राज्यात अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा आहे. या साठ्यावरच पिण्यासाठी, शेती आणि उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान राज्य, जिल्हा आणि शहर प्रशासनावर असणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. मराठवाड्यात केवळ २३.७५ टक्के पाणीसाठा असल्याने येथील जल आवर्षणाचे संकट गडद बनले आहे.राज्यात सप्टेंबर महिन्यात जवळपास पाऊस बरसलाच नाही. परतीचा पाऊस देखील रुसला. परिणामी राज्यातील पाऊस नसलेल्या आणि पाऊस पडलेल्या भागातही दुष्काळी स्थिती आहे. पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ठिकाणची पिके वाया गेली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर, पाऊस सरासरीच्या जवळ अथवा अधिक असलेल्या भागात पावसात सातत्य नसल्याने तेथील पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळेच सुमारे दोनशे तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. राज्यातील ३ हजार २६६ लहान मोठ्या धरणांची ४८ हजार ६३० दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असून, उपयुक्त पाणीसाठा ४० हजार ८२८ दशलक्ष घनमीटर आहे. यंदा २६ आॅक्टोबर अखेरीस धरणांमध्ये अवघा अवघा २४ हजार ८७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे.  राज्यात पुणे आणि कोकण प्रदेशात तुलनेने पावसाची स्थिती अधिक चांगली आहे. पुणे विभागाची १५ हजार २११ दशलक्ष घनमीटरची क्षमता असून, सध्या १२ हजार २१३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा (८०.२९ टक्के) आहे. गेल्यावर्षी याचकाळात ९४ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागाची ३ हजार ५१० दशलक्ष घनमीटर पाणीक्षमता आहे. सध्या ३ हजार १३ दशलक्ष घनमीटर (८५.८४ टक्के) पाणीसाठा असून, गेल्यावर्षी त्याची टक्केवारी ९४.२६ टक्के इतकी होती. मराठवाड्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७ हजार ३७४ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १ हजार ७५१ दशलक्ष घनमीटर (३२.७५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण ७० टक्के होते. नाशिकची क्षमता ५ हजार ९३४ दशलक्ष घनमीटर असून, ३ हजार ७९९ (६४ टक्के), तर नागपूर विभागाच्या ४ हजार ६०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १ हजार ७४३ दशलक्ष घनमीटर (३७.८४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये गेल्यावर्षी ८४.२८ आणि नागपूरमध्ये ४२.२१ टक्के पाणीसाठा होता. आॅक्टोबरमध्येच ही स्थिती असल्याने यंदा प्रशासनाला योग्य जलनीती राबवावी लागणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसWaterपाणीdroughtदुष्काळDamधरण