मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:56 IST2026-05-15T14:52:49+5:302026-05-15T14:56:36+5:30
एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत मुंबई, दिल्लीत झाल्या बैठका

मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब' आणि डेटा सेंटर पार्क निर्मितीसाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत १.१४ लाख कोटींचा करार झाला असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या करारामागे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचेही ते म्हणाले. एक्सवरील पोस्टमध्ये मंत्री सामंत यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले.
आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत 'AM Intelligence Labs Private Limited' च्या प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न झाली.
— Uday Samant (@samant_uday) May 14, 2026
यावेळी उपस्थित राहून उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आणि 'इंटेलिजन्स'चा प्रभावी वापर कसा वाढवता येईल, यावर सकारात्मक चर्चा केली.… pic.twitter.com/s8FbapHo8K
उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आणि 'इंटेलिजन्स'चा प्रभावी वापर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही एमएमआर क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले. खासदार डॉ. शिंदे यांच्या विशेष निमंत्रणावरून एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाने १.१४ लाख कोटींचा (१२ अब्ज डॉलर्स) सामंजस्य करार केला. खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई आणि नवी दिल्लीत घेतलेल्या सातत्यपूर्ण बैठका व पाठपुराव्याचे हे यश आहे, असे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात १,१४,००० कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक! 🚀नवी दिल्ली आणि मुंबईतील सातत्यपूर्ण बैठका व पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे ( @DrShrikantShinde ) यांच्या विशेष निमंत्रणावरून, AM Intelligence Labs Private… pic.twitter.com/SQBouFnNne
— Uday Samant (@samant_uday) May 14, 2026
या गुंतवणूक करारामुळे मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब' आणि डेटा सेंटर पार्क उभारले जाणार आहे. यामुळे येथे २,००० ते ३,००० पेक्षा जास्त उच्च-तंत्रज्ञान रोजगारांची निर्मिती होईल. २४ तास नवीकरणीय ऊर्जेवर चालणारा हा देशातील अग्रगण्य प्रकल्प ठरेल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राला देशाची 'डिजिटल आणि एआय राजधानी' बनवण्याच्या दिशेने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले.