शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

चिंताजनक! मराठवाड्यात महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:27 AM

अवकाळीच्या फटक्यानंतर उचलले पाऊल

औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या खरीप हंगामातील पिकांची माती झाली. या अवस्थेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात ६८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.यंदाच्या दहा महिन्यांमध्ये मराठवाड्यात ७४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने ४१ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील कापणीला आलेले पीक हिरावून नेले. मका, सोयाबीन, कापूस व इतर कडधान्यांच्या पिकांचा अतिपावसामुळे चिखल झाला.या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे गणितच बिघडले. कोरड्या दुष्काळानंतर गारपिटीचा फटका, तर अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी कर्जमुक्त होण्याऐवजी कर्जबाजारी होत चालला आहे. कर्ज फेडावे कसे, या चक्रव्यूहात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे हताश व निराश होऊन मराठवाड्यातील ६८ शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत आत्महत्या केल्या.बीड जिल्ह्यात सर्वाधिकबीड जिल्ह्यात या महिनाभरात सर्वाधिक १६ जणांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद जिल्ह्यात ९, जालना जिल्ह्यात ६, परभणीत ११, हिंगोलीमध्ये ४, नांदेड १२, लातूर ७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या