शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 05:59 IST

गेल्या वर्षभराच्या कालावधीत या आजाराच्या सुमारे १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत.

मुंबई: राज्यात एचआयव्ही (ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस) बाधित रुग्णांच्या उपचाराबाबत चिंताजनक माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या आजाराच्या सुमारे १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत. ही बाब सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली.

राज्यातील विविध शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एचआयव्ही रुग्णांना मोफत अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी उपलब्ध करून दिली जाते. मात्र, तरीही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार नियमितपणे न घेता मध्येच बंद करत असल्याचे आढळून आले. तज्ज्ञांच्या मते, उपचार अर्धवट सोडल्यास रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतातच, शिवाय विषाणू इतरांमध्ये पसरण्याचा धोका देखील वाढतो.

सामाजिक कलंक, भीती, आर्थिक अडचणी, स्थलांतर, औषधांचे दुष्परिणाम, तसेच उपचार केंद्रांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ही प्रमुख कारणे उपचार अर्धवट सोडण्यामागे आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव तसेच जनजागृतीची कमतरता यामुळेही ही समस्या अधिक तीव्र होत आहे.

आतापर्यंत चार लाख जणांवर उपचार

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २००४ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपचारातून फॉलो-अप हरवलेल्या रुग्णांची संख्या एकत्रितपणे १५,४३० आहे. महाराष्ट्रात २००४ मध्ये एआरटी सेवा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ४,१३,३९५ एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना एआरटी उपचार सुरू करण्यात आले.

देशात एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक असतानाही, महाराष्ट्र राज्यात एकूण 'ऑन-एआरटी' रुग्णांपैकी फक्त ३.७ टक्के रुग्ण फॉलो अपला हरवलेले आहेत. एकूण १५,४३० एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींपैकी २३.२६ टक्के रुग्ण हे स्थलांतरित आहेत. एचआयव्ही/एड्स हा अधिसूचित आजार नसतानाही आम्ही ९८ टक्के एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांना उपचारांत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत.

'एआरटी'तील कर्मचारी साधतात संपर्क

रुग्णाने नियोजित औषध उचलण्याचा दिवस चुकवताच एआरटी केंद्रातील कर्मचारी फोनद्वारे संपर्क साधतात आणि आउटरीच वर्कर घरी भेट देऊन रुग्णाला पुन्हा उपचारात आणतात.

English
हिंदी सारांश
Web Title : 15,000 HIV Patients Abandon Treatment: Serious Warning for Public Health

Web Summary : Over 15,000 HIV patients in Maharashtra stopped treatment, raising public health concerns. Reasons include stigma, access issues, and migration. Maharashtra has initiated treatment for 4,13,395 individuals since 2004, with efforts to reconnect patients to care through outreach programs.
टॅग्स :HIV-AIDSएड्सMaharashtraमहाराष्ट्र