शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूर तालुक्यातील ५० सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST

अहमदपूर तालुक्यात सिंचन विहिरींचे १०९ प्रस्ताव मंजूर झाले असून, ५९ प्रस्तावांचे कार्यारंभ आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, पावसाळा ...

अहमदपूर तालुक्यात सिंचन विहिरींचे १०९ प्रस्ताव मंजूर झाले असून, ५९ प्रस्तावांचे कार्यारंभ आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरी अद्यापपर्यंत ५० सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत. ऑनलाईन व ऑफलाईन सर्व व्यवहार सुरू असताना कार्यारंभ आदेश देऊन शेतकऱ्यांना पत्र देण्याचे शिल्लक असतानाही कोरोनाचे कारण दाखवित हे कार्यारंभ आदेश थांबल्याचे दिसून येत आहे.

कार्यारंभ आदेश दिलेली गावे आणि विहिरींची संख्या : चिखली ५, टाकळगाव ३, ढाळेगाव ५, नांदुरा खु. ५, आंबेगाव २, मावलगाव ५, काळेगाव ५, शिवनखेड ५, लांजी येथे ३ विहिरींच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या प्रत्येक लाभार्थीस विहीर खोदकामासाठी ३ लाखांचे अनुदान असून, त्यातील १ लाख ८४ हजार मजुरांच्या नावावर त्यांच्या कामानुसार जमा होतात. तसेच कुशल कामगारांचे १ लाख १६ हजार लाभार्थींच्या अथवा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात येतात. आतापर्यंत १३७ विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत, असे पंचायत समितीकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांकडून पाठपुरावा...

तालुक्यात ५० सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळाले नाहीत. त्यात सोरा ५, आनंदवाडी ५, केंद्रेवाडी १०, वळसंगी १०, कोपरा १०, उन्नी ५ अशा सात गावांतील ५० विहिरींचे कार्यारंभ आदेश शिल्लक आहेत.

शेतकऱ्यांची अडचण...

पावसाळ्यापूर्वी कार्यारंभ आदेश देणे आवश्यक आहे. सिंचन विहीर मंजुरीचे सर्व अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रस्ताव समोर येऊनही गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

लवकरच कार्यारंभ आदेश...

आतापर्यंत मंजूर १३७ विहिरींची कामे चालू झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात १०९ सिंचन विहिरी मंजूर करण्यासंबंधीचे प्रस्ताव आले आहेत. त्यातील ५९ प्रस्ताव मंजूर करून संबंधित शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. उर्वरित ५० विहिरींचे कार्यारंभ लवकरच देण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड यांनी सांगितले.