शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

उच्च माध्यमिक प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण लातूर : लातूर विभागीय मंडळांतर्गत उच्च माध्यमिक परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण सोमवारी सकाळी ११ ते ...

उच्च माध्यमिक प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण

लातूर : लातूर विभागीय मंडळांतर्गत उच्च माध्यमिक परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्ह्याच्या वितरण केंद्रावर करण्यात येणार आहे. नांदेड येथे पीपल्स हायस्कूल, गोकुळनगर येथे, तर उस्मानाबाद जिल्ह्यात श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आणि लातूर येथे विभागीय मंडळ, विभागीय सचिव कार्यालयात होईल. संबंधितांनी प्रमाणपत्रे प्रस्तुत वेळेत उपलब्ध करून घ्यावीत, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज

लातूर : जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टल ३ डिसेंबरपासून सुरू केले आहे. १० जानेवारीपर्यंत सदर पोर्टल सुरू राहणार आहे. त्यामुळे प्राचार्य, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून मंजुरीसाठी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्मार्ट योजनेत जिल्हा अव्वल

लातूर : राज्य शासनाने २०२०-२१ मध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला गट यांना लाभ होणार आहे. आतापर्यंत ७५४ प्रस्ताव सादर झाले आहेत. लातूर जिल्ह्याने नोंदणीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रकल्प संचालक आर.एस. पाटील, बी.पी. किरवले यांनी प्रयत्न केले.

मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी योजना

लातूर : मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी शेती अर्थसाह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज पोर्टलवर ११ जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. या तारखेत प्राप्त अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. संबंधित शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी सभापती गोविंद चिलकुरे, कृषी विकास अधिकारी एस.आर. चोले यांनी केले.

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश

लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपासून ते १५ जानेवारी २०२१ रोजी दिवसभर शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.