शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरातील कमावता गमावला, अनुकंपा नोकरीने लातूरमध्ये ५९ कुटुंबीयांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 20:02 IST

लातूर जिल्हा परिषदेत ५९ जण रुजू; काळाच्या आघाताने खडतर जीवनमार्ग कंठणाऱ्या कुटुंबीयांना मिळाला आधार!

लातूर : काळाच्या आघातामुळे शासकीय नोकरदाराचा आकस्मित मृत्यू झाल्याने कुटुंबांवर आभाळ कोसळले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब खडतर जीवनमार्ग कंठित होते. शासनाच्या धोरणानुसार अनुकंपा तत्त्वाखाली भरती प्रक्रिया राबवून जिल्हा परिषदेने ५९ पात्र पाल्यांना सरकारी सेवेत रुजू करून घेतले आहे. त्यामुळे या कुटुंबांना पुन्हा मोठा आधार मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन, पंचायत, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे, बांधकाम, अर्थ, शिक्षण असे विविध विभाग आहेत. या विभागाअंतर्गतच्या काही कर्मचाऱ्यांचे आकस्मित, दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे मयत झालेल्या नोकरदाराच्या कुटुंबावर मोठे संकट काेसळले. घरकर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधारच हरवला. त्यामुळे काही कुटुंबांसमोर तर दैनंदिन जीवन कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला. अशा कुटुंबांना साहाय्य करीत त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषदेच्या सेवेत घेण्यासाठी गुरुवारी नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात आली.

निवड झालेल्यांची समुपदेशनाने नियुक्ती...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेसाठी निवड समितीची बैठक झाली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अनुकंपा तत्त्वानुसार निवड झालेल्या ५९ जणांना नियुक्ती आदेश देत समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली.

प्रतीक्षा यादीत आणखीन २०० जण...
अनुकंपा तत्त्वानुसार नियुक्ती मिळावी म्हणून अर्ज केलेल्यांपैकी २०० जण अजून प्रतीक्षा यादीत आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या निवडीसाठी एकूण ६३ जण पात्र होते. त्यापैकी चौघांची न्यायालयीन प्रकरणे सुरू असल्याने उर्वरित ५९ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी चांगले कार्य करावे...
शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्वावर ५९ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबांना आधार मिळाला आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी चांगले कार्य करावे आणि कुटुंबाबरोबर प्रशासनाचाही लौकिक वाढावा.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.

नियुक्ती आदेश मिळाल्याने आनंद...
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यांनी वर्षभराच्या आत अर्ज करावा लागतो. सीईओ अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक पात्रतेनुसार ५९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच तात्काळ पदस्थापनाही देण्यात आली आहे.
- श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद