शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी जळकोटातील ७३० कुटुंबांना मिळाला आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST

जळकोट : निवारा नसलेल्यांना राहण्यासाठी हक्काचे चांगले घर रहावे म्हणून शासनाच्यावतीने विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ...

जळकोट : निवारा नसलेल्यांना राहण्यासाठी हक्काचे चांगले घर रहावे म्हणून शासनाच्यावतीने विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत तालुक्यात सन २०१७ ते २०२१ या कालावधीत एकूण १ हजार १० घरकुलांना मंजुरी मिळाली. दरम्यान, त्यातील ७३० घरांची कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे पावसाळ्यात होणारी अडचण दूर झाली आहे.

ज्या कुटुंबास राहण्यासाठी पक्के घर नाही, अशांसाठी पंतप्रधानमंत्री आवास योजनेसह अन्य विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून सदरील कुटुंबांना घर बांधकामासाठी १ लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कमी- जास्त प्रमाणात अनुदान दिले जाते. जळकोट तालुक्यात सन २०१७ ते २०२१ या कालावधीत एकूण १ हजार १० घरकुलांसाठी पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १ हजार ८ लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामास सुरुवात केल्याने त्यांना पहिला हप्ता देण्यात आला. त्यातील ७३० लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे झाल्याने लाभार्थ्यांची होणारी परवड थांबणार आहे. दरम्यान, २८० घरकुलांची बांधकामे वाळूअभावी रखडली आहेत. वाळू उपलब्ध होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

दरम्यान, सदरील लाभार्थ्यांची अडचण पाहून शासनाच्या आदेशाचा आधार घेत गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदरील लाभार्थ्यांना घरकुलासाठी काही प्रमाणात वाळू उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव सादर केला होता; मात्र सदरील लाभार्थ्यांना अद्यापही वाळू उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यातही या लाभार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

५ ब्रास मोफत वाळू द्यावी...

प्रशासनाने घरकुल बांधकामासाठी मोफत ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी. शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुलासाठीच्या अनुदानाच्या रकमेतील तफावत दूर करावी, अशी मागणी रिपाइंचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, खादरभाई लाटवाले, गोपाळकृष्ण गबाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेटे, प्रशांत देवशेट्टे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, मनोहर वाकळे, शिरीष चव्हाण, संग्राम नामवाड, अनिल गायकवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, सत्यवान पांडे, बालाजी सूर्यवंशी, अजीजभाई मिस्त्री, आयुब शेख, बालाजी गवळी यांनी केली आहे.

८ कोटी ७६ लाखांचे खर्च...

सदरील घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत ८ कोटी ७६ लाखांचा खर्च झाला आहे. गोरगरिबांना पावसाळ्यापूर्वी हक्काचा निवारा मिळावा म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रयत्न करून संबंधिताना निर्देश दिले. त्यामुळे गरिबांना आधार मिळाला आहे.