शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उगवलेले सोयाबीन गोगलगाईंनी केले फस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निलंगा : तालुक्यात यंदा उशिरा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करुन पेरणी केली. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निलंगा : तालुक्यात यंदा उशिरा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करुन पेरणी केली. मात्र, उगवलेलं कोवळं सोयाबीन गोगलगाई फस्त करत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र, कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

निलंगा तालुक्यातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. दरम्यान, गत आठवड्यात पाऊस झाल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्या. सोयाबीन पीकही चांगले उगवले. परंतु, उगवलेल्या सोयाबीनवर गोगलगाईने हल्ला केला आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे कोवळे पीक गोगलगाईने फस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे.

नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. तालुक्यात सोयाबीनचा ७० हजार हेक्टरवर पेरा झाला. मात्र, नव्या संकटाने शेतकरी धास्तावले आहेत. सोयाबीन पीक गोगलगाय फस्त करत असल्याने शेतकरी गोगलगाय वेचणीचे काम करत आहेत. दिवसभर शेतात फिरून गोगलगाय टोपल्यात जमा करून त्या शेतीच्या बाहेर टाकून देत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेत आहेत. परंतु, अपेक्षित माहिती मिळत नसल्याने अडचण येत आहे. दरवर्षी सोयाबीन फुलोऱ्यात आल्यानंतर खोडमाशी, लष्करी अळी, उंट आळी अशाप्रकारची संकटे येत असत. परंतु, यंदा गोगलगाईचे नवीन संकट आल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शेतीचे बांध स्वच्छ ठेवावेत...

तालुक्यातील बहुतांश भागात खरीप पेरणी झाली आहे. पण पावसाचा खंड पडल्याने पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. जेणेकरून गोगलगायींना थांबण्यासाठी अथवा आश्रयासाठी जागा मिळणार नाही. प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी पिकांना अथवा फळपिकांना आच्छादन करण्याचे टाळावे. सायंकाळी अथवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी जमा करून साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

शेतात अथवा फळबागांमध्ये सात ते आठ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे अथवा भाजीपाला पिकाचे ढीग तयार करून ठेवावेत. गोगलगाय दिवसा त्याठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याठिकाणी गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी जमा करून नष्ट करावीत. शेत अथवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा ४ सेमी रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंधक म्हणून टाकावा.

रासायनिक पध्दतीचा अवलंब करावा...

कीटकनाशकांचे विषारी औषध तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा अधिक २५ ग्रॅम यीस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात (२०० ग्रॅम गुळ अधिक १० लीटर पाणी) १२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्डिहीड (२.५ टक्के) ५० ग्राम मिसळावे. ते शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात अथवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे. तसेच विषारी औषध बनविण्यापूर्वी, कीटकनाशक हाताळताना, चेहरा, डोळे व शरिराचे संरक्षण करण्यासाठी हातमोजे, चष्मा वापरावा.

- रणजित राठोड, मंडल कृषि अधिकारी.