शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

३३ गावांतील रुग्णांसाठी वलांडी आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

वलांडी : देवणी तालुक्यातील आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन ...

वलांडी : देवणी तालुक्यातील आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे, असा ठराव देवणी पंचायत समितीने घेतला आहे. येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण झाल्यास ३३ गावांतील व परिसरातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

वलांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या केंद्रा अंतर्गत ८ उपकेंद्रे आहेत. ३३ गावांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविली जाते. याशिवाय सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील रुग्णही येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नोंदणीचे प्रमाण अधिक आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या सुविधा मिळत असल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया होतात. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा परिस्थितीतही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कमी प्रमाणात असतानाही आरोग्य सुविधा तत्काळ देण्यात येत आहेत.

परिणामी, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण पडत असल्याने येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी २५ मार्च रोजी विशेष ग्रामसभा घेऊन पंचायत समितीकडे दाखल केला होता. या ठरावाची दखल घेऊन पंचायत समितीच्या सभापती सविता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वलांडीत ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा ठराव घेतला आणि पुढील मंजुरीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.

जिल्हा परिषदेकडील ठराव प्रलंबित...

वलांडी येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्यात यावे, यासाठी २९ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीने ठराव सादर केला होता. तेव्हा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करून ३ सप्टेंबर २०१९ रोजी तो आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबितच आहे. येथील आरोग्य केंद्रावरील रुग्णसंख्येचा ताण व सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आल्याची माहिती सरपंच राणीताई भंडारे, मोहम्मद रफी सय्यद, उपसरपंच महेमुद सौदागर यांनी दिली.