शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात ३५० शिवभोजन थाळींचे मोफत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

अहमदपूर : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यल्प दरात जेवण मिळावे, या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी उपक्रमास चांगला ...

अहमदपूर : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यल्प दरात जेवण मिळावे, या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात आला. दरम्यान, हळूहळू कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे शिवभोजन थाळीचा तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला. सध्या शासनाच्या वतीने मोफत शिवभोजन दिले आज असून, त्याचा अहमदपुरात ३५० जणांना लाभ होत आहे. त्यामुळे गरजूंची भूक भागविली जात आहे.

गरजू नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना महाविकास आघाडीच्या सरकारकडून एप्रिल २०२० पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजनेचा प्रारंभ जिल्हा व मोठ्या शहरांमधून करण्यात आला. त्यानंतर कोरोनाचे संकट सुरू होताच ही योजना तालुकास्तरावर राबविण्याचे नियोजन करून तालुक्याच्या ठिकाणीही शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. १० रुपयांना असणारी शिवभोजन थाळी कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला.

लॉकडाऊन काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशावेळी लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या अहमदपूर शहरात तीन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून दररोज ३५० थाळी तालुक्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. गरजूंना पाच रुपयांत जेवण देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

ब्रेक द चेनची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थ्यांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने या कालावधीत असे हाल होऊ नयेत म्हणून शिवभोजन थाळी पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार १५ एप्रिलपासून एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अहमदपुरात तीन केंद्र...

शासनाकडून एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे. शहरातील तीन केंद्रांतून ३५० शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. शिवभोजन थाळी केंद्रचालकांनी मोफत थाळीचे वाटप करावे. गरजू लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार डी.के. मोरे यांनी केले आहे.