शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वरातीविना विवाह सोहळ्यामुळे घोडे सांभाळणाऱ्यांपुढे आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

अहमदपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विवाह सोहळ्यावर विविध निर्बंध आले आहेत. परिणामी, सध्या विवाह सोहळा, वरात ही घोड्याविना होत आहे. ...

अहमदपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विवाह सोहळ्यावर विविध निर्बंध आले आहेत. परिणामी, सध्या विवाह सोहळा, वरात ही घोड्याविना होत आहे. परिणामी, त्यावर उपजीविका करणाऱ्या काळेगाव येथील १५ कुटुंबांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून लग्नसोहळे मर्यादित स्वरूपात होत आहे. तसेच मिरवणूक, वरातीवरही बंधने आली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका घोडे सांभाळणाऱ्यांना बसला आहे. सर्वसाधारणपणे नवरदेवाची मिरवणूक अथवा वरातीसाठी घोडा असणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यातून एका घोडेवाल्यास किमान ३ ते ५ हजार रुपये मानधन मिळते. त्याचबरोबर घोड्याला लागणारा खुराक मिळतो. मात्र सध्या घोड्याविना वरात आणि वरातीविना विवाह सोहळा पार पडत आहे. परिणामी, काळेगाव येथील १५ कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकाच गावातील १५ घरात घोडे असून तेथील घोड्यांचा उपयोग हा वरात व शेवंतीसाठी केला जातो. परंतु, सध्या सदरील कुटुंबांना घोड्याच्या चंदीसाठीही अडचणी येत आहे. केवळ आता शेतात जाण्यासाठी घोड्यांचा वापर होत आहे. शासनाकडूनही कुठलीही मदत त्यांना मिळाली नाही. या व्यवसायात सय्यद जागीरदार, सय्यद मुजफ्फर, सय्यद माजिद, सय्यद जुनेद, सय्यद अकबर, सय्यद अखलाक हे पिढ्यान पिढ्यांपासून काम करीत आहेत. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे.

खुराकाचा भाव वाढला...

काळेगाव येथे १५ ते २० घोडे सांभाळणारे असून त्यांचा पिढीजात हा व्यवसाय आहे. सध्या कुठलेही काम नाही. मात्र घोड्याला आवश्यक असणाऱ्या खुराकाचे भाव दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे अडचण येत असल्याचे काळेगाव येथील घोडे मालक सय्यद अझहर जहागीरदार यांनी सांगितले.

अनेक पिढ्यांपासून व्यवसाय...

अहमदपूर जवळील काळेगाव येथे जहागीरदार यांचे मोठे कुटुंब असून त्यातील अनेक व्यक्ती दुबईत काम करतात. मात्र पूर्वजांना घोडे सांभाळण्याचा छंद होता. त्यानंतर पुढील पिढीने त्याचे व्यवसायात रूपांतर केले. विवाह समारंभात घोड्यावरून वरात काढणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असे. मात्र आता छोटेखानी विवाह होत असल्याने अडचणी वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले.