शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना ग्रामसेवकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST

नागरसोगा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावांत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. औसा तालुक्यात एकूण १०९ गावे असून ...

नागरसोगा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावांत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. औसा तालुक्यात एकूण १०९ गावे असून त्यासाठी ८९ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आहेत.

कोरोनामुळे शहरातील नागरिक गावी परतले आहेत. काेरोनाच्या दुस-या लाटेचा प्रभाव अधिक असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना ग्रामसेवकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामसेवक रात्रन् दिवस कार्यरत आहेत. बाधिताच्या घर सील करणे, निर्जंतुकीकरण, बाधिताच्या घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी, त्यांच्या नोंदी ठेवाव्या लागत आहेत. गावातील एखाद्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याचा शोध घेऊन विलगीकरणात पाठविणे अशी कामे करावी लागत आहेत.

याशिवाय, ग्रामपंचायत दैनंदिन कामकाज, ग्रामस्थांत जनजागृती करावी लागत आहे. गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष मदत करीत असले तरी गाव पातळीवर सर्वाधिक ताण ग्रामसेवकांवर आहे.

औसा तालुक्यातील एकूण १०९ गावे असून त्यासाठी ७३ ग्रामसेवक व १६ ग्रामविकास अधिकारी आहेत. गेल्या वर्षी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र यंदा बाधित ग्रामसेवकांची संख्या अधिक होती. उपचारानंतर बरे झाल्यानंतर ते कामावर रुजू झाले आहेत.

आतापर्यंत १० जणांना संसर्ग...

ग्रामीण भागात ग्रामसेवक फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्य करीत आहेत. त्यामुळे अतिरिक्त ताण वाढला आहे. शासनाच्या प्रत्येक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागते. आतापर्यंत तालुक्यातील एकूण १२ ग्रामसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील १० जण कोरोनामुक्त होऊन कामावर रुजू झाले आहेत. दोघांवर उपचार सुरु आहेत. शासनाने ग्रामसेवक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वेळेत उपचार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी औसा तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शरद बिराजदार यांनी केली.