शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
8
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
9
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
10
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
11
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
12
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
13
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
14
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
15
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
16
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
17
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
18
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
19
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
20
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची चुकीचे धोरणे, ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:02 IST

विलासरावांबद्दल नितांत आदर, मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल

लातूर : काँग्रेसच्या ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण झाले. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेवर विशेष भर देत शहरांचा विकास साधल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. दरम्यान, लातुरात भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भाने डॅमेज कंट्रोल करीत मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचा पुनरुच्चार केला.

लातूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी ५० हजार कोटी मिळाले आहेत. यातून भुयारी गटारी, घनकचरा व्यवस्थापन अशी कामे हाती घेण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनाला मोठ्या प्रमाणात पैसा दिला आहे. लातूर शहर घनकचरा व्यवस्थापनात मॉडेल शहर होईल, असे ते म्हणाले. मंचावर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी आ. शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आ. पाशा पटेल, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर उपस्थित होते.

लातूर- मुंबई पाच तासांत, औद्योगिकीकरणाला वेग
समृद्धी महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यांतून गेला आहे, तिथे कारखानदारी वाढली आहे. लातूर-कल्याण महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबईचे अंतर पाच तासांवर येईल. ज्यामुळे लातूरमध्ये औद्योगिकीकरणात वाढ होईल. लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये मेट्रो आणि वंदे भारत ट्रेनची निर्मिती लवकरच होणार आहे. या फॅक्टरीचे काम प्रगतिपथावर असून, १० हजार स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लातूर नेतृत्वाची भूमी, विलासरावांबद्दल आदर
लातूरच्या भूमीत नेतृत्व तयार करण्याचे गुण आहेत. या भूमीनेच देशाला शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख यांच्यासारखे कर्तबगार नेते दिले आहेत. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे, अशा शब्दांत तत्कालीन नेतृत्वाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून चुकीचे शब्द गेल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्र्राच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे त्यांचे नेतृत्व होते. आमची लढाई काँग्रेससोबत असली तरी आदर प्रकट करताना मला कसलाही संकोच नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis slams Congress policies, blames neglect for city decay.

Web Summary : Chief Minister Fadnavis criticized Congress's neglect leading to urban decay. He highlighted BJP's focus on waste management and cleanliness for city development. He also lauded Vilasrao Deshmukh's contributions despite political differences, emphasizing respect for his leadership and contributions to Maharashtra.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस