शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जळकोट बाजार समितीतील शेतीमालाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST

जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० ते ६० आडत दुकाने आहेत. येथील बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला ...

जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० ते ६० आडत दुकाने आहेत. येथील बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे जानेवारीत दर वर्षी चांगली आवक होऊन उलाढाल होत असते. परंतु, यंदा तालुक्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन गेले. त्यानंतर तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बहुतांश गावातील तुरीचा खराटा झाला. ज्वारी काळी पडली. परिणामी, आवक घटली आहे.

शेती उत्पादन झाले नसल्याने बाजार समितीत आवक नाही. परिणामी, बाजार समितीतील व्यापाऱ्यांसह हमाल, मापाडी हैराण झाले आहेत. तुरीचे नुकसान होऊनही त्याचे पंचनामे झाले नाहीत. तसेच अद्यापही खरीप हंगामातील पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे.

उलाढाल मंदावली...

जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षी या दिवसांत तुरीची ५०० ते ७०० पोत्यांची आवक असते. तसेच सोयाबीनची हजार ते बाराशे पोत्यांपर्यंत आवक होत असते. परंतु, यंदा अतिवृष्टीमुळे ही पिके हातची गेली आहे. त्यामुळे सध्या दररोज ५० ते १०० पोते शेतमालाची आवक होत आहे. परिणामी, येथील आर्थिक उलाढाल मंदावली आहे, असे जळकोट बाजार समितीचे प्रशासक अमोल वाघमारे व सचिव बालाजी उगिले यांनी सांगितले.