शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

एकावर हल्लाः गल्ली बोळातून धावपळ, नानीबाई चिखलीत गव्याचा तब्बल सहा तास थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 19:24 IST

वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागाचे अधिकारी तसेच,मुरगुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्यासाठी पथकाचे तब्बल चार तास अथक प्रयत्न सुरू होते.

ठळक मुद्दे नागरिकांची गर्दी

दत्ता पाटील   (म्हाकवे)

नानीबाई चिखली(ता.कागल)येथे भरदुपारी १वा. गव्याने चिखलीतील मगदूम, नुल्ले, आंबी गल्लीत हैदोस घातला.काही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे तो भितरला होता.त्यांने रुद्ररूप धारण करत समोर येणाऱ्यांच्या दिशेने हल्ला चढविला होता. या गव्याच्या हल्ल्यात कृष्णात मारुती पोवार(वय५५) हे जखमी झाले.त्यांच्या कानाला दु:खापत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करून त्यांना सीपीआर कडे हालविण्यात आले आहे.येथे तब्बल सहा तास गव्याचा थरार सुरू होता. त्याला पाहण्यासाठी चिखलीसह परिसरातील बघ्यांमुळे पथकाला गव्याला पकडण्यात अडचणी येत होत्या.
वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागाचे अधिकारी तसेच,मुरगुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गव्याला पकडण्यासाठी पथकाचे तब्बल चार तास अथक प्रयत्न सुरू होते.


म्हाकवेतही गव्याचे दर्शन
बुधवारी सकाळी९वा.म्हाकवे गावच्या पुर्वेकडील शिवारात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांनी गवे फिरताना पाहीले.त्यामुळे या महिला भयभीत होवून घरी परतल्या.तसेच,शेतकरी रात्रीअपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी तसेच,शेतीकामासाठी महिला शेतात जात असतात.परंतु, वारंवार गव्यांचे कळप दिसत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

....म्हणूनच गवे सैरभैर
गत महिन्यात म्हाकवे आणूर मार्गावरून रात्रीचे मोटरसायकलने जाणाऱ्या युवकांवर कळपातील गव्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.जंगलात लावल्या जाणाऱ्या आगी आणि ऊसतोडीमुळे ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे.त्यामुळे गव्यांना बसायला जागाच नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले असून रात्रंदिवस भरकटताना दिसत आहेत.त्यामुळे वेदगंगा व चिकोत्रा नदीकाठावरील गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.
 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग