शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"माझी वसुंधरा"योजनेसाठी उदगांव सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST

* प्रशासनाचे योग्य व्यवस्थापन शुभम गायकवाड : उदगांव ‘माझी वसुंधरा’ योजनेसाठी उदगांव गावची निवड झाली आहे. या योजनेसाठी पर्यावरण ...

* प्रशासनाचे योग्य व्यवस्थापन

शुभम गायकवाड : उदगांव ‘माझी वसुंधरा’ योजनेसाठी उदगांव गावची निवड झाली आहे. या योजनेसाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने उद्दिष्ट ठरवून दिले असून त्याप्रमाणे नियोजन आखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायत व तरुण संघटनांनी कंबर कसली आहे. राज्यातील मोठ्या गावांची निवड केली असल्याने त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या योजनेसाठी प्रथमत: समिती नेमली असून त्या माध्यमातून विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये प्रामुख्याने स्वच्छतेवर भर दिला असून भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण करणे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता, जलस्रोतांचे संवर्धन करणे, जमिनीची धूप थांबविणे, ऊर्जा बचत करणे यासंबंधी उद्दिष्ट तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार गुणांकन देण्यात येणार आहे. गावातील मानसमित्र फौंडेशन, ड्रीम फौंडेशन यासारख्या सामाजिक संस्थांनी हिरिरीने सहभाग घेतल्याने या स्पर्धेत आम्हीच जिंकू, अशी अपेक्षा तरुण मंडळींकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.

चौकट -

सोशल मीडियाचा योग्य वापर या योजनेसाठी व्हॉट्स अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आला असून गावातील अडचणी थेट त्यावर टाकण्यात येतात. तत्काळ त्यावर मार्ग काढून त्याचेही छायाचित्र ग्रुपवर टाकण्यात येत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.

कोट - अशाप्रकारच्या योजनेत पहिल्यांदाच उदगांव सहभागी होत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन काम करू व योजनेत यशस्वी होऊ.

- सुहास उदगावे, उपाध्यक्ष, मानसमित्र फौंडेशन

कोट - ही योजना गावाचा चेहरामोहरा बदलून टाकणार असून त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे. त्यामुळे सर्वांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे.

- रायसिंग वळवी, ग्रामविकास अधिकारी उदगांव