शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख जणांकडे ‘पंतप्रधान विमा’

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

जिल्ह्णात प्रचंड प्रतिसाद: एकविस दिवसांत विक्रमी लोकांनी घेतला लाभ, ३१ आॅगस्टपर्यंत मुदत

भीमगोंडा देसाई - कोल्हापू प्रधानमंत्री सुरक्षा’ आणि ‘जीवनज्योती बीमा’ योजना केंद्र शासनाने सुरू केल्यानंतर केवळ २१ दिवसांत जिल्ह्णातील साडेतीन लाख जणांनी हा विमा उतरविला आहे. याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तसेच काही सहकारी बॅँकामध्येही विमा उतरविण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत असलेली ही मुदत वाढवून आता ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत करण्यात आली आहे. विमा योजनांची अंमलबजावणी ९ मेपासून सुरू झाली आहे. बँकांनी आपल्या खातेदारांना एसएमएसद्वारे विमा उरविण्याचे आवाहन केले. याशिवाय शासनाने सर्व संस्था, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, अन्य स्थानिक स्वराज्य संस्था यांना आदेश देऊन इच्छुुक खातेदारांचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. वर्षाचा विमा हप्ता कमी आणि दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण असल्यामुळे मध्यमवर्गीय, सर्वसामान्य खातेदारही याचा लाभ घेत आहेत. बँकेत खाते असल्यास आधार कार्डच्या झेरॉक्ससह, वारसदाराचे नाव आणि जन्मतारखेसह विहित नमुन्यातील अर्ज भरून दिल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्यामुळे बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकेत विमा घेण्यासाठी सुरुवातीपासून गर्दी कायम आहे. सुरक्षा बीमा योजनेतून विमा संरक्षणासाठी वार्षिक हप्ता फक्त १२ रुपये आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणालाही याचा लाभ घेता येतो. हा विमा उतरविलेल्याचा अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना व पूर्ण अपंगत्व आल्यास संबंधितांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. हप्ता नाममात्र असल्यामुळे या विम्यास अधिक लोक पसंती देत आहेत. जीवन ज्योती विमा योजनेतून १८ ते ५० वर्षे वयोगटातील आधार कार्डधारक कोणतीही व्यक्ती विम्याचा लाभ घेऊ शकते. हा विमा असलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणांनी मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी वार्षिक विमा हप्ता ३३० रुपये आहे. विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांत तसेच काही सहकारी बॅँकांत खाते असल्यास एकाच बँकेतून हा लाभ घेता येणार आहे.दोन्ही विमा योजनेतून कमी दिवसांत जिल्ह्णातील साडेतीन लाख खातेदारांनी विमा उतरविला आहे. वार्षिक हप्त्याची रक्कम कमी असल्यामुळे बहुतेकांनी सुरक्षा विमा योजना उतरविणे पसंत केले आहे. विमा उतरविण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. - एम. जी. कुलकर्णी, व्यवस्थापक, अग्रणी बँक, कोल्हापूर