शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नदी उशाला तरी कोरड घशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST

रमेश सुतार : बुबनाळ सन २०१० साली मंजूर झालेल्या गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम दहा वर्षांपासून ...

रमेश सुतार : बुबनाळ सन २०१० साली मंजूर झालेल्या गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे. जिल्हा परिषद आणि ठेकेदार यांच्या वादामुळे कृष्णा नदीकाठालगत असणाऱ्या गणेशवाडीत पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असल्याने ‘नदी उशाला, तरी कोरड घशाला’ अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणारे गणेशवाडी गाव कृष्णा नदीकाठालगत आहे. या गावाला शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी पाणीपुरवठा संस्थेतून पाणीपुरवठा होतो. मात्र, अपुरा पाणीपुरवठा, वारंवार होणारी गळती यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१० साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ३ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर होऊन काम सुरू झाले. मात्र, ठेकेदार आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वादामुळे ८० टक्के काम होऊनदेखील योजनेचे काम दहा वर्षे रेंगाळले आहे. २०१४ साली कामांची मुदत होती. मात्र, सहा वर्षे होऊनदेखील काम थांबले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर बैठकांचा फार्स करण्यात आला आहे. मात्र, काम सुरू झाले नाही. २०१९ च्या महापुरात जॅकवेलवरचे साहित्य वाहून गेले आहे. महापुरात जॅकवेलजवळची माती ढासळल्यामुळे एका बाजूला झुकले आहे. फिल्टर हाऊसचे कामही अपूर्ण आहे. यामुळे गावातील १२०० कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेकांना बोअरचे पाणी वापरत गुजराण करावी लागत आहे.

---------------------------

कोट - पेयजल योजनेचे काम मंजूर होऊन दहा वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकावे लागत आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांनी लक्ष घालून तातडीने प्रश्न सोडवावा.

- प्रशांत अपिने, सरपंच गणेशवाडी ग्रामपंचायत.

फोटो - १२०३२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठालगत असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाण्याच्या जॅकवेल महापुरामुळे झुकला आहे. (छाया - रमेश सुतार)