शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्यासह पावसाची उसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने काहीशी उसंत घेतली. रविवारी दिवस-रात्र जोरदार पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने काहीशी उसंत घेतली. रविवारी दिवस-रात्र जोरदार पाऊस कोसळल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऊसपिकाला मात्र हा पाऊस पोषक ठरला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने गेली दोन दिवस गोवा, कोकणात धुमाकूळ घातला आहे. कोकणात वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा कोल्हापूर जिल्ह्यालाही फटका बसला. रविवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वाऱ्यांमुळे डेरेदार वृक्ष भुईसपाट झाले आहेत. रस्त्यावर तुटून पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा अक्षरश: खच पडला होता. लॉकडाऊन असल्याने वाहतूक कमी असली तरी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कसरत करतच मार्ग काढावा लागला. रविवारी रात्रभर पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सोमवारी सकाळीही अकरापर्यंत ग्रामीण भागात पाऊस राहिला. तौक्ते वादळ मुंबईहून गुजरातच्या दिशेने सरकत राहिले तसे वारे व पावसाची तीव्रता कमी झाली होती. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरात मात्र वारे थांबले होते, आकाश काहीसे स्वच्छ झाले आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले.

जिल्ह्यात सध्या उन्हाळी भात, भुईमूग काढणी सुरू आहे. या पावसाने काढणी थांबली असून या पिकांचे नुकसान झाले आहेे.

शिवार पाण्यांनी तुडुंब

दोन दिवसांच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले होते. उसाच्या सरीत पाणी तुंबले आहे. पाऊस थांबला असला तरी किमान चार-पाच दिवस जमिनीला वापसा येणार नाही.

आडसाल ऊस, मका झाला आडवा

जुलै, ऑगस्टमध्ये केलेल्या उसाच्या आडसाल लागणी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. वैरणीसाठीचा मका, गाजरी गवतालाही फटका बसला असून अनेक ठिकाणी मका भुईसपाट झाला आहे.

खरीप मशागत लांबणीवर

जिल्ह्यात अक्षयतृतीयेनंतर खरीपाचा पेरा सुरू होतो. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात भाताच्या धूळवाफ पेरणी अधिक होतात. ‘रोहिणी’ नक्षत्रात पेरले आणि ‘मृग’ नक्षत्रात पाऊस सुरू झाला तर पेरा साधला जातो. यंदा मात्र वादळी पावसाने हे वेळापत्रक काहीसे कोलमडण्याची शक्यता आहे. जमिनीला वापसा नसल्याने मशागत लांबणीवर पडणार आहे.

निरूत्साही वातावरण

जिल्ह्यात दोन दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घरी रहावे लागले. तरीही पाऊस, वारा आणि थंडी एकूणच निरूत्साही वातावरणामुळे घराबाहेर पडू वाटत नव्हते.

फोटो ओळी : कोल्हापुरात सोमवारी वाऱ्यासह पावसाने उसंत घेतली. मात्र, सकाळी ढगाळ वातावरण राहिले. (फोटो-१७०५२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)