शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘वरद’ हत्याप्रकरणी आरोपीची केली मनोवैज्ञानिक चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाच्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. ...

कोल्हापूर : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या बालकाच्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (रा. सोनाळी) याने हत्येची कबुली दिली, तरीही हत्या नेमकी कशासाठी केली याचे गूढ अद्याप उकललेले नाही. त्यामुळे संशयित आरोपीची मंगळवारी नवी मुंबईत मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. संशयिताची नार्को चाचणी करण्यात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी दत्तात्रय वैद्य याला अटक केली. हत्येला प्रथम नरबळीचा रंग देण्यात आला. नंतर हे नरबळी नसल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीने वरद या बालकाची हत्या करण्यामागचे कारण शोधण्यात पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. हत्या प्रकरणाला महिना उलटला तरीही नेमके कारणाचे गूढ उकललेले नाही. संशयित आरोपी दत्तात्रय वैद्य याची मानसिकता तपासणीसाठी सोमवारी रात्री त्याला कडेकोट बंदोबस्तात पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे हे घेऊन नवी मुंबईला रवाना झाले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता नवी मुंबईत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्याच्यावर मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आली. सुमारे दोन ते अडीच तास ही चाचणी घेण्यात आली. चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागणार आहे. कोणत्याही गंभीर अगर क्रूर गुन्ह्यात आरोपीची पोलिसांमार्फत मनोवैज्ञानिक चाचणी अग्रक्रमाने केली जाते. त्याच पद्धतीने ही चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली. तूर्त तरी नार्को चाचणी करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तपास स्थानिक पोलिसांमार्फतच

हत्याप्रकरणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही स्थानिक पोलिसांकडून योग्य पद्धतीने व गतीने तपास सुरु आहे. तपास कामाबाबत गोपनीयता पाळली जात आहे, तरीही हत्येचे गूढ लवकरच उलगडेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.