शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST

गडहिंग्लज : जुलैमधील महापुरामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात मिळून हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या ...

गडहिंग्लज : जुलैमधील महापुरामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात मिळून हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या कामालाच आपले प्रथम प्राधान्य राहील, अशी माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापुरामुळे निर्माण झालेल्या पुनर्वसनाच्या कामासंदर्भातील अडचणी व दिशा यासंदर्भात त्यांनी विवेचन केले, तसेच आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नदेखील मार्गी लावण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाघमोडे म्हणाले की, पुनर्वसन हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यासंदर्भातील आदेश प्राप्त होताच कार्यवाही सुरू होईल; परंतु त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पूरबाधित कुटुंबांची गावनिहाय माहिती संकलित केली जाईल.

दरम्यान, गावनिहाय बैठका घेऊन पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. अपवाद वगळता बहुतेक पूरबाधित गावात पुनर्वसनासाठी शासकीय जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी जमिनी मालकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नव्या कायद्यानुसार भू-संपादनाचा मोबदला म्हणून रेडिरेकनरपेक्षा चौपट रक्कम दोन महिन्यात मिळू शकते. यासंदर्भात जनजागृती करून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वेच्छेने जमिनी देण्यासाठी खातेदार तयार व्हावेत, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

-------------------------

बाबासाहेब वाघमोडे : १९०८२०२१-गड-०६