शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली : ९५ बंधारे पाण्याखाली, कोल्हापुरात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तेरा नद्यांवरील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ८ राज्य व २५ प्रमुख जिल्हा मार्गावर बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्दे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली : ९५ बंधारे पाण्याखाली प्रयाग चिखली, आंबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तेरा नद्यांवरील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ८ राज्य व २५ प्रमुख जिल्हा मार्गावर बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी दिवसभरात तीन फुटांने वाढली, सायंकाळी पातळी ३९ फुटाच्या पुढे गेल्याने महापूराचे संकट अधिक गडद झाले आहे.

गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला.

सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी चार तासांत फुटांने वाढली, त्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महापुराचे संकट येणार हे निश्चित आहे.पाटगावसह आठ धरणे भरलीभुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण सोमवारी सकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने (३.७२ टीएमसी) भरले. त्यातून प्रतिसेकंद १०७२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ धरणे भरली असून सहा अद्याप बाकी आहेत.

चिखली गावातील आतापर्यंत २५ टक्के लोकांनी स्थलांतर केले आहे. उर्वरीत लोक स्थलांतर करत आहेत. पी. ए. सिस्टमवर अनाऊंस्मेंट सुरु आहे.धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा -राधानगरी (८.३६), तुळशी (३.२८), वारणा (३१.५०), दूधगंगा (२३.६३), कासारी (२.३६), कडवी (२.५२), कुंभी (२.४१), पाटगाव ( ३.७०).

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरRainपाऊस