शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
7
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
8
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
9
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
11
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
12
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
13
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
14
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
15
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
16
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
17
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
18
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
19
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
20
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली : ९५ बंधारे पाण्याखाली, कोल्हापुरात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तेरा नद्यांवरील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ८ राज्य व २५ प्रमुख जिल्हा मार्गावर बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्दे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली : ९५ बंधारे पाण्याखाली प्रयाग चिखली, आंबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तेरा नद्यांवरील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ८ राज्य व २५ प्रमुख जिल्हा मार्गावर बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी दिवसभरात तीन फुटांने वाढली, सायंकाळी पातळी ३९ फुटाच्या पुढे गेल्याने महापूराचे संकट अधिक गडद झाले आहे.

गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला.

सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी चार तासांत फुटांने वाढली, त्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महापुराचे संकट येणार हे निश्चित आहे.पाटगावसह आठ धरणे भरलीभुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण सोमवारी सकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने (३.७२ टीएमसी) भरले. त्यातून प्रतिसेकंद १०७२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ धरणे भरली असून सहा अद्याप बाकी आहेत.

चिखली गावातील आतापर्यंत २५ टक्के लोकांनी स्थलांतर केले आहे. उर्वरीत लोक स्थलांतर करत आहेत. पी. ए. सिस्टमवर अनाऊंस्मेंट सुरु आहे.धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा -राधानगरी (८.३६), तुळशी (३.२८), वारणा (३१.५०), दूधगंगा (२३.६३), कासारी (२.३६), कडवी (२.५२), कुंभी (२.४१), पाटगाव ( ३.७०).

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरRainपाऊस