शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली : ९५ बंधारे पाण्याखाली, कोल्हापुरात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तेरा नद्यांवरील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ८ राज्य व २५ प्रमुख जिल्हा मार्गावर बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्दे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली : ९५ बंधारे पाण्याखाली प्रयाग चिखली, आंबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तेरा नद्यांवरील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ८ राज्य व २५ प्रमुख जिल्हा मार्गावर बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी दिवसभरात तीन फुटांने वाढली, सायंकाळी पातळी ३९ फुटाच्या पुढे गेल्याने महापूराचे संकट अधिक गडद झाले आहे.

गेली चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्रभर पावसाचा जोर राहिला, सोमवारी सकाळपासून तर त्यात वाढ होत गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७७.७५ मिलीमीटर पाऊस झाला.

सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात १३०.८३ तर गगनबावडा तालुक्यात १२४.५० मिलीमीटर झाला. पंचगंगेची पातळी चार तासांत फुटांने वाढली, त्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महापुराचे संकट येणार हे निश्चित आहे.पाटगावसह आठ धरणे भरलीभुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण सोमवारी सकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने (३.७२ टीएमसी) भरले. त्यातून प्रतिसेकंद १०७२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ धरणे भरली असून सहा अद्याप बाकी आहेत.

चिखली गावातील आतापर्यंत २५ टक्के लोकांनी स्थलांतर केले आहे. उर्वरीत लोक स्थलांतर करत आहेत. पी. ए. सिस्टमवर अनाऊंस्मेंट सुरु आहे.धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा -राधानगरी (८.३६), तुळशी (३.२८), वारणा (३१.५०), दूधगंगा (२३.६३), कासारी (२.३६), कडवी (२.५२), कुंभी (२.४१), पाटगाव ( ३.७०).

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरRainपाऊस