शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कालकुंद्रीनजीकची उघडी डी.पी. ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

कालकुंद्री-कुदनूर मार्गावर वीज वितरण कंपनीतर्फे बसवलेली डी.पी. गेली सात-आठ वर्षे उघडीच आहे. मुख्य रस्त्यावर केवळ दोन फूट उंचीवर असलेली ...

कालकुंद्री-कुदनूर मार्गावर वीज वितरण कंपनीतर्फे बसवलेली डी.पी. गेली सात-आठ वर्षे उघडीच आहे. मुख्य रस्त्यावर केवळ दोन फूट उंचीवर असलेली ही डीपी लहान मुले व पाळीव प्राण्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. मोडलेला दरवाजा तत्काळ बसवून डीपी बंदिस्त करावी, अशी मागणी होत असून, परिसरातील ग्रामस्थांनी या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारून ती थकवल्यास तत्काळ कारवाई करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत अनेक वेळा तोंडी-लेखी विनंती अर्ज देऊनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

या मार्गावरून कालकुंद्री येथील गाय, म्हैस, बैल यांसह पाळीव जनावरे कुदनूर ओढ्याकडे धुण्यासाठी सोडली जातात. मालक मागे राहिलेला असताना बऱ्याचवेळा ही जनावरे या डीपीला आपले अंग घासताना दिसतात. उघड्या फ्यूजला जनावरांचे तोंड, शरीराचा भाग चिकटल्यास किंवा जाता-येता लहान मुलांनी येथे हात लावल्यास गंभीर दुर्घटना घडण्याचा संभव आहे. याबाबत गेल्या सात-आठ वर्षात अनेकदा तोंडी-लेखी सांगूनही वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी या बाबतीत मात्र डोळेझाक करत आहेत. याबाबत परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आठ दिवसात डीपी दरवाजा लावून बंदिस्त न केल्यास कोवाड वीज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा कालकुंद्री ग्रामस्थांनी दिला आहे.

-------------------------

फोटो ओळी : कालकुंद्री-कुदनूर मार्गावरील वीज वितरण कंपनीची डी.पी. गेल्या सात-आठ अशा उघड्या स्थितीत असल्याने नागरिक व जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

क्रमांक : ०४०५२०२१-गड-०५