शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भडकला, कोथिंबीर आवाक्यात, रताळ्यांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:44 IST

vegetable, market, kolhapur अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.

ठळक मुद्दे कांदा भडकला, कोथिंबीर आवाक्यात, रताळ्यांची आवक वाढलीनिर्बंध उठल्यानंतर पहिलाच आठवडा बाजार फुल्ल

कोल्हापूर : अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल केल्यानंतर पाच महिन्यांनंतर रविवारी लक्ष्मीपुरीचा आठवडा बाजार भरला. पहिल्याच दिवशी बाजार हाऊसफुल्ल झाला. दसऱ्याच्या निमित्ताने फळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, खरेदीसाठीही झुंबड उडाली आहे. रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे.पावसामुळे भाजीपाला कुजल्याने बाजारात टंचाई आहे. तरीदेखील खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. पालेभाज्या कमी प्रमाणात दिसत असून, दरही चढेच आहे. मेथी २५ ते ३० रुपये पेंढी आहे, कोथिंबीरचे दर आवाक्यात आले असून, ३० रुपयांची पेंढी आता १० ते १५ रुपयांवर आली आहे. उपवासासाठी रताळ्यांची मागणी वाढल्याने दरही ३० ते ४० रुपये किलोवर स्थिर आहेत. कांदा ५० ते ६०, लसूण १२०, बटाटा ४० रुपये किलो असा भाव आहे.धान्यबाजार वधारलासणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने धान्य, कडधान्यांची मागणी वाढते, दरही वाढतात. त्याची सुरुवात बाजारात दिसत आहे. तांदूळ २५ ते ७५ रुपये किलो आहे. ज्वारी ४० ते ५६ रुपये, गहू ३० ते ३८ रुपये आहे. कडधान्यामध्येही दरात वाढच आहे. हरभरा डाळ ७० रुपयांवर स्थिर आहे. मटकी १११०, मसूरा व मसूर डाळ ८०, चवळी ८०, मूग डाळ १०० असे दर चढतच आहेत.भाजीपाला कडाडलाभाजीपाल्याचे दर ८० ते १२० रुपयांवर गेले आहेत. वांगी, दोडका १२० भेंडी, बिन्स, वरणा, कारली ८० रुपये किलो आहेत. टोमॅटो ४० रुपये किलो आहेत. काकडी ३० रुपये किलो आहे. कडीपत्ता, पुदीना १० रुपये पेंढी आहे. फ्लावर ३० ते ५० रुपये नग आहे.फळ बाजारात स्वस्ताईभाजीपाला, धान्यात महागाईने टोक गाठलेले असताना त्या तुलनेत फळबाजारात काहीशी स्वस्ताई नांदत आहे. सफरचंद, डाळिंब, मोसंबी ८० रुपये किलो, केळी २० ते ४० रुपये डझन, चिकू ४० रुपये किलो असा दर आहे. 

धान्य बाजारात आवक कमी आहे. दरात चढउतार आहेत. आता सणावारामुळे मागणी वाढू लागली आहे.अनिल महाजन, धान्य व्यापारी

पाच महिन्यांपासून आठवडा बाजार बंद असल्याने भाजी विक्रीवर मर्यादा होत्या. आता बाजार सुरू झाल्याने भाजी विक्री सुरू केली आहे. घर चालविण्यापुरते पैसे मिळणार असल्याने आनंदी आहे.- आदम मुजावर,भाजी विक्रेता

मी पन्हाळ्याहून भाजी विक्रीसाठी आले आहे. मूळचे बंगळूरचे; पण आम्ही शेतात जंगली वांगे लावले आहे, त्याच्या विक्रीसाठी आले आहे.सन्मती कांबळे, पन्हाळा 

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्याkolhapurकोल्हापूर