शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

... दाद ना फिर्याद.. कोरोना संसर्गच अमर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST

गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जसे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, त्यावरूनच प्रशासनाचे प्रयत्न असफल होत असल्याचे पाहायला मिळत ...

गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण जसे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, त्यावरूनच प्रशासनाचे प्रयत्न असफल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षी २०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत सापडला आणि तेथून संसर्गाची साखळी निर्माण झाली. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही साखळी तुटली अशी वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. सुस्त झालेली यंत्रणा आळस झटकून सज्ज होईपर्यंत कोरोना विषाणूने शहरातील सर्वच भागात आपले बस्तान बसविले.

वास्तविक दुसरी लाट येणार असल्याचे आणि कोल्हापूर शहरातील अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणार असल्याची पूर्वसूचना केंद्र व राज्य सरकारने दिले असताना जानेवारी, फेब्रुवारी व मार्च अशा तीन महिन्यांत पूर्वतयारी करून ठेवण्याची आवश्यकता होती, परंतु प्रशासनाने काहीही केले नाही. रुग्ण वाढतील तशी व्यवस्था करु, असे सांगत प्रशासन वेळ मारुन नेत राहिले. त्यामुळे व्हायचा तो गोंधळ झालाच. दि. १ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रात रोज शंभरच्या पुढे नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून यायला लागले. रोज १००, २००, ३०० रुग्ण आढळून यायला लागले तरी यंत्रणा संथगतीने काम करत आहे.

-गृहअलगीकरण मोठी चुूक -

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या लाटेवेळी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तरी त्यांना घरात अलगीकरणास परवानगी देण्यात आली. हीच मोठी घोडचूक ठरली. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन सौम्य लक्षणे तसेच कोणतीच लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरात अलगीकरण होण्यास परवानगी देण्यात आली; परंतु घडले उलटेच. त्याच घरातील चार ते पाच व्यक्ती संसर्गामुुळे बाधित झाल्या. बाधितांच्या घरातील अन्य व्यक्ती खुलेआम बाजारपेठेत खरेदी, सार्वजनिक ठिकाणचा प्रवास करू लागल्या. समाजात मिसळून राहू लागल्या. त्यामुळे संसर्ग रोखण्याऐवजी तो अधिक गतीने फैलावण्यास सुरुवात झाली.

एप्रिल, मे महिन्यात विस्फोट-

यावर्षी पालिका क्षेत्रात जानेवारीत २२५ ,फेब्रुवारीत ३४३, मार्चमध्ये ८१६ कोरोनाबाधित नवे रुग्ण समोर आले. त्यानंतर एप्रिल व मे हे दोन महिने शहराच्या दृष्टीने अतिशय घातक ठरले. एप्रिल महिन्यात ५४४७ तर दि. १८ मेअखेर ५२२३ नवीन रुग्णांची भर पडली. म्हणजेच दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा महाभयंकर उद्रेक झाला आणि नेमकी याचकाळात प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे.

संपर्कातील व्यक्तींचा शोध कुठाय?

एखादा कोरोना रुग्ण आढळून आला तर त्याच्या नजिकच्या संपर्कातील व्यक्तींची सक्तीने आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना आहेत; परंतु नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणेच आता बंद झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात शहरात १० हजार ५०० नवे बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या संपर्कातील पाच जरी व्यक्तींची चाचणी करायची झाली असती तर किमान ५० हजार चाचण्या व्हायला पाहिजे होत्या. पण इतक्या मोठ्या संख्येन चाचण्या झालेल्या नाहीत, हे स्पष्ट आहे.

-प्रोटोकॉल बासनात, अधिकारी बैठकीत

कागदोपत्री नियोजन करण्यात प्रशासन आघाडीवर आहे, परंतु प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही. प्रोटोकॉलनुसार जेव्हा रुग्ण सापडतो त्यावेळी त्याला नेण्यासाठी रुग्णवाहिका दारात पोहोचायची. तेथील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जायचा. तेथे औषध फवारणी केली जायची. रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे सक्तीने स्राव घेऊन त्याचे अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात रवानगी व्हायची. जरी अहवाल निगेटिव्ह आला तरी चौदा दिवस गृहअलगीकरणात राहण्याची सक्ती व्हायची. दारावर ‘होम क्वारंटाईन’चे स्टीकर लावले जायचे. प्रभाग सचिवांचे त्यांच्यावर नियंत्रण असायचे. परगावांहून कोण आले याची नोंदी व्हायच्या. पण आता यातील काहीही होत नाही. सगळ बेभरवशावर आहे.