शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
3
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
4
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
5
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
6
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
11
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
14
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
15
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
16
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
17
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
18
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
19
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
20
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बिद्री कारखान्यावर रात्री केलेली कारवाई चुकीची - ए. वाय. पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:45 IST

सूडबुध्दीच्या राजकारणापेक्षा सरकारने सभासदांच्या हिताची भूमिका घ्यावी

निवास पाटील

सोळांकूर : ‘बिद्री’ साखर कारखाना २१८ गावातील ६५ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. कारखान्यावर रात्रीच्या वेळी केलेली कारवाई एकदम चुकीची असून सूडबुध्दीच्या राजकारणापेक्षा शेतकरी सभासदांच्या हितासाठी काही तरी करता येते का? हे राज्य सरकारने बघावे, अशी टीका ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

ए. वाय. पाटील म्हणाले, ‘बिद्री’ साखर कारखाना आमची मातृसंस्था असून या संस्थेवर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहे. शेतकरी, कामगारांसह छोट्या छोट्या व्यावसायिकांचा संसार कारखान्यावर उभा आहे. कारखान्याचा कोणी राजकारणासाठी वापर करत असेल तर ते या परिसरातील शेतकरी सहन करणार नाहीत. कारखान्यात काही चुकीच्या बाबी घडल्या असतील तर योग्य त्या यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी करुन त्याचा जाबही विचारला पाहिजे. याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारणही नाही. 

पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री उशिरा केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. या कारवाईने ‘बिद्री’ची बदनामी झाली आहे, याला जबाबदार कोण? येथे सत्ता कोणाची आहे यापेक्षा तो कारखाना ६५ सभासदांचा आहे, याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेA. Y Patilए. वाय. पाटीलExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग