शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा भ्रष्टाचाराचा नवा फंडा : तोडलेले कनेक्शन जोडायचे, तर ५०० रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 13:57 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणने वसुलीचा धडाका लावत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यावर कळस म्हणून तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची पैशाची मागणी होत आहे. महावितरणकडून शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराच्या या नव्या फंड्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा भ्रष्टाचाराचा नवा फंडा तोडलेले कनेक्शन जोडायचे, तर ५०० रुपये द्या

कोल्हापूर : आधीच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेकडे थकलेली वीजबिले भरण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आंदोलने सुरू आहेत. तरीदेखील महावितरणने वसुलीचा धडाका लावत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यावर कळस म्हणून तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची पैशाची मागणी होत आहे. महावितरणकडून शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराच्या या नव्या फंड्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.वीज बिल भरणार नाही, कृती समितीने केलेल्या आवाहनामुळे बिले भरण्यास नागरिकांनी हात अखडता घेतला आहे. बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीमच उघडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजारांवर कनेक्शन्स तोडली आहेत.

या सर्वांना रिकनेक्शन देणे ही महावितरणची जबाबदारी असताना, ३०० ते ४०० रुपयांची मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर हा सिस्टीममधूनच मेसेज येतो. त्यामुळे पैसे घ्यावे लागतात हे उत्तर दिले जात आहे.बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीची आंदोलनाची हाकमहावितरणकडून सुरू असलेल्या या अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठवण्यासाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती पुढे आली आहे. किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की, सतीश पोवार, राहुल चौधरी, गुरुदत्त म्हाडगुत, सुमित खानविलकर, प्रशांत बरगे, मुसा शेख, महादेव जाधव, अनिल कोळेकर, विजय जाधव यांनी कनेक्शन जोडायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले, तर संघटितपणे विरोध करा, असे आवाहन केले आहे.

एक तर वाढीव बिले आमच्या माथ्यावर मारली आहेत. ती भरली नाहीत, तर कनेक्शन तोडण्याचा दांडगावा केला जात आहे. हा सारासार अन्याय असून, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना दिसतील तेथे घेरावो घालू, त्यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे, तेथे जाऊन काळे झेंडे दाखवू.-किसन कल्याणकर,संस्थापक, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती

विजेचे कनेक्शन तोडले असल्याने महावितरणच्या नियमांनुसार तेथे कर्मचाऱ्याचा वापर होत असल्याने त्याचे चार्जेस आकारले जातात. घरगुती कनेक्शन तोडले असल्यास ३०० रुपये लेबर चार्जेस म्हणून आकारणी केली जाते. हा नियमच आहे, यात काही काळेबेरे अथवा भ्रष्टाचार नाही.-किशोर खोबरे,जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर