शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांबरोबरच त्यांच्या पालकांचेदेखील मानसिक आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांबरोबरच त्यांच्या पालकांचेदेखील मानसिक आरोग्य बिघडले आहे. मुले आणि पालकांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होण्यासारखे प्रकार वाढले आहेत. त्यावर पालकांनी वेळीच सावध होऊन पाल्यांसमवेत सुसंवाद वाढविणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाइन पद्धतीने शाळा भरविण्यास सुरुवात केली. या माध्यमातून ऑफलाइन शिक्षणाला पर्याय मिळाला. मात्र, मोबाइलच्या अतिवापरामुळे आणि मैदानी खेळांवर मर्यादा आल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. मुलांच्या शिक्षणाची चिंता, त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरविताना होणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे पालकांची मानसिकताही बिघडत आहे. विद्यार्थी, पालकांमधील संवाद वाढल्यास मानसिकता योग्य राहण्यास मदत होणार आहे.

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली : ५५३०१

दुसरी : ५७४५२

तिसरी : ५७६०९

चौथी : ५७८३४

पाचवी : ५७८४१

सहावी : ५७३९५

सातवी : ५८३२०

आठवी : ५८८००

नववी : ६०२२६

दहावी : ५६७४५

मुलांच्या समस्या

१) आक्रमकता, चिडचिडेपणा वाढला

२) एकाग्रता कमी झाली

३) चंचलता वाढली

४) ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओचे व्यसन

पालकांच्या समस्या

१) मुलांवर राग काढणे, त्यांच्यावर वारंवार चिडणे

२) नैराश्याची वृत्तीमध्ये वाढ

३) मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत भीती

४) हतबलतेचे विचार

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात

कोरोनामुळे पारंपरिक ऑफलाइन शिक्षण पद्धत थांबून ऑफलाइनचा वापर वाढला आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुले गेमिंग, व्हिडिओच्या विळख्यात अडकत आहेत. त्यांच्यात चिडचिडपणा, आक्रमकता वाढत आहे. घरातील एकापेक्षा जास्त मुलांना ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा पुरविताना आर्थिक कसरतीमुळे पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यावर सुसंवाद वाढविणे चांगला पर्याय आहे.

-डॉ. निखिल चौगुले

ऑनलाइन शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे त्यांची एकाग्रता कमी होत असून, चंचलता वाढत आहे. नोकरी, व्यवसायातून घरी आल्यानंतर पालकांचादेखील स्क्रीन टाइम वाढला आहे. त्याचा परिणाम मुलांवरही होत आहे. त्यावर पालकांनी मोबाइल वापरण्याबाबत स्वयंशिस्त बाळगावी. घरात आल्यानंतर मुलांसमवेत त्यांनी वाचन करावे. बुद्धिबळ, बैठे खेळ खेळावेत. त्यांच्याशी संवाद वाढवावा.

-डॉ. अश्विन शहा

220821\22kol_1_22082021_5.jpg

डमी (२२०८२०२१-कोल-डमी १०८०)