शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरला रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST

जयसिंगपूर : कॅन्सरला शेतकरी जबाबदार नसून, पंचगंगा नदीपात्रातील रासायनिक दूषित पाणीच जबाबदार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. पंचगंगेचे प्रदूषण ...

जयसिंगपूर : कॅन्सरला शेतकरी जबाबदार नसून, पंचगंगा नदीपात्रातील रासायनिक दूषित पाणीच जबाबदार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. पंचगंगेचे प्रदूषण हेच मोठे दुखणे असून, शिरोळ तालुक्याबरोबरच पंचगंगा नदीकाठच्या गावांत कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरला थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, जयसिंगपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त येथील स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात कॅन्सर मुक्ती परिषद झाली.

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आशितोष पाटील म्हणाले, धूम्रपानाच्या सवयीमुळे ९५ टक्के लोकांना कॅन्सर होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे साडेसतरा लाख कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी आढळतात, तर दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो आहे. कॅन्सर होऊ नये यासाठी प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांची मानसिकता बदलावी.

बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले, शिरोळ तालुक्यात कॅन्सरमुक्तीची चळवळ यशस्वी करायची असेल तर विषमुक्त शेती व निरोगी भारत अभियान राबविले पाहिजे.

यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, सावकर मादनाईक यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, आसावरी आडके, मुक्ताबाई वगरे, डॉ. महावीर अक्कोळे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, अभय भिलवडे, वासुदेव भोजणे, आदी उपस्थित होते. स्वागत नगरसेवक शैलेश चौगुले यांनी केले. शैलेश आडके यांनी आभार मानले.

--------------

चौकट - जीवनशैली बदलण्याची गरज : शंकर गौडा

शेतीसाठी वापरली जाणारी ५०० कीटकनाशके धोकादायक आहेत. औषधे फवारणेबाबत प्रबोधन गरजेचे असून, आरोग्याला की उत्पादनाला महत्त्व द्यायचे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. शिरोळ तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या रक्तांचे नमुने तपासले तर आरोग्याची नेमकी वस्तुस्थिती पुढे येणार आहे, असे रायचूर विद्यापीठाचे कार्यकारी संचालक शंकर गौडा यांनी सांगितले.

फोटो - ०४०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे कॅन्सर मुक्ती परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.