शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : टोलविरोधी लढ्याचे रणशिंग फुंकल

By admin | Updated: October 15, 2014 00:44 IST

जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम प्रथम राज्यकर्त्यांनी आणि आता

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाने टोलप्रश्नी न्याय दिलेला नाही, तर फक्त निवाडा केला आहे. कोल्हापूरच्या अस्मितेला धक्का देणारा हा न्यायालयाचा निर्णय  असून, जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम प्रथम राज्यकर्त्यांनी आणि आता न्यायालयाने केले आहे. असे कितीही धक्के बसले तरी कोल्हापूरकर अस्मितेपासून दूर जाणार नाहीत. आता या क्षणापासून टोल न भरता, पुन्हा एकदा तीव्र आंदोलनासाठी कोल्हापूरकरांनी सज्ज राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एन. डी. पाटील म्हणाले, गेली चार वर्षे कोल्हापूरकर सातत्याने रस्त्यांवर येऊन टोलविरोधात लढा देत आहेत. जनतेने एकाच मुद्द्यावर सातत्याने रस्त्यांवर येणे आणि राज्यकर्त्यांनी बघ्याची भूमिका घेणे,  हे भूषणावह नाही. टोलबाबत  आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने कोल्हापूरकरांची साफ निराशा  झालेली आहे. न्यायालयातही कोल्हापूरच्या अस्मितेला न्याय मिळाला नाही. कोल्हापूरकरांनी  ‘टोल देणार नाही,’ ही सुरुवातीपासूनची भूमिका यापुढेही कायम ठेवावी. आता टोलविरोधातील हा लढा या क्षणापासून सुरू झाला आहे. उच्च न्यायालयानंतर आता सर्वाेच्च न्यायालयात टोलचा लढा सुरू होईल. न्यायालयांच्या या खंडपीठांपेक्षाही जनतेचे न्यायालय मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनातही न्यायालयाने अनेक निवाडे दिले होते. जनतेच्या सार्वभौम शक्तीपुढे या निवाड्यांचा टिकाव लागला नाही. त्याप्रमाणेच टोलबाबतही जनता जे म्हणेल तेच होईल, असा विश्वासही एन. डी. पाटील यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पितृत्व घेणाऱ्यांची जबाबदारीआता निवडणुकीच्या तोंडावर यापूर्वी काहीच न बोलणाऱ्यांनी मूग महाग केले. टोलचे पितृत्वही काही मंत्र्यांनी घेतले. यामध्ये काही विद्यमान, तर काही होऊ घातलेले मंत्री आहेत. टोलप्रश्न मिटवितो म्हणणाऱ्यांच्या शब्दांत किती ताकद आहे, ते त्यांनी दाखविण्याची वेळ आली आहे. कार्यकर्त्यांचा पवारांवर अन्यायमाजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना टोलप्रश्न माहीतच नाही, हे हास्यास्पद आहे. पवारांच्या एकाही कार्यकर्त्याने वा नेत्याने या प्रश्नाची तीव्रता त्यांना जाणवून दिली नसेल, याबाबत आश्चर्य वाटते. पवारांना कोल्हापुरातील इतका मोठा प्रश्न न सांगण्याइतपत कार्यकर्त्यांनी पवारांवर अन्याय करू नये, असा टोला एन. डी. पाटील यांनी हाणला.टोल न देणे गुन्हा नाहीकोल्हापूरकरांनी टोल देऊ नये. टोल न देणे हा काही गुन्हा नाही. टोल न देणाऱ्या वाहनांवर ‘आयआरबी’ने बळजबरी किंवा कायदेशीर कारवाईचा प्रयत्न केल्यास सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे कायदेशीर सहकार्य करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनी दिली.टोलप्रश्नी दृष्टिक्षेपात प्रकल्पकोल्हापूरचा महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प : किंमत २२० कोटी रुपयेशहर एकात्मिक रस्ते प्रकल्प मंजूर : ३१ मार्च २००६ ८ आॅगस्ट २००७ ला पहिली निविदा प्रसिद्धप्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा : २९ आॅक्टोबर २००७ ‘आयआरबी’ची निविदा मंजूर : २७ मार्च २००८ मनपा, राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीदरम्यान त्रिसदस्यीय करार : १० जुलै २००८ ‘आयआरबी’ला कामाची वर्क आॅर्डर : ९ जानेवारी २००९आंदोलनामुळे टोलवसुलीस स्थगिती : १७ डिसेंबर २०११ टोलविरोधात पहिला महामोर्चा : ९ जानेवारी २०१२मुख्यमंत्र्यांनी टोलची स्थगिती उठविली : २९ मे २०१३ कामगारमंत्री व गृहराज्यमंत्र्यांशी कृती समितीची बैठक : २१ जून २०१३टोलविरोधात दुसरा महामोर्चा : ८ जुलै २०१३टोलवसुलीस पोलीस संरक्षण देण्याचे न्यायालयाचे आदेश : २७ सप्टेंबर २०१३प्रत्यक्ष टोलवसुली सुरू : १८ आॅक्टोबर २०१३टोल रद्दसाठी उपोषण सुरू : ६ जानेवारी २०१४मंत्र्यांची टोल रद्दची घोषणा : ११ जानेवारी २०१४पुन्हा टोलवसुलीमुळे नाके पेटविले : १२ जानेवारी २०१४उच्च न्यायालयाची टोलवसुलीस स्थगिती : २७ फेब्रुवारी २०१४जिल्हाधिकाऱ्यांना कृती समितीचे निवेदन : ४ एप्रिल २०१४‘आयआरबी’ची सर्वोच्च न्यायालयात धाव : ९ एप्रिल २०१४सर्वोच्च न्यायालयाची टोलवसुलीस स्थगिती : २१ एप्रिल २०१४सर्वोच्च न्यायालयाने टोलवरील स्थगिती उठविली : ५ मे २००४(३१ जुलै २०१४ पर्यंत उच्च न्यायालयास निर्णय घेण्याचे निर्देश) टोलविरोधात तिसरा महामोर्चा : ९ जून २०१४रस्त्यांची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन : ११ जून २०१४पुन्हा टोलवसुली सुरू : १६ जून २०१४रस्ते मूल्यांकन समितीचा दौरा : २३ जून २०१४मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ ‘कोल्हापूर बंद’ : २६ आॅगस्ट २०१४सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उच्च न्यायालयात सुनावणी सुरू : २९ सप्टेंबर २०१४उच्च न्यायालयातील सुनावणी संपली; निकाल राखीव : ३० सप्टेंबर २०१४उच्च न्यायालयाने टोलच्या सर्व याचिका फेटाळल्या : १४ आॅक्टोबर २०१४