शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: =पंचगंगेची पातळी ४९ फूटावर गेल्यास कोल्हापुरातून रेल्वे वाहतूक होणार बंद, प्रवासाला निघण्यापूर्वी करा चौकशी

By संदीप आडनाईक | Updated: July 27, 2024 21:08 IST

Kolhapur News: पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा.

- संदीप आडनाईक

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे पाणी जर ४९ फुट पातळीवर पोहोचले तर कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरुन सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कांही दिवस चौकशी करुनच प्रवास करावा. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील पूलाव ४८ फूट पाणी आले आहे. पाण्याची पातळी जर ४९ फूटावर गेली तर कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वेची वाहतूक बंद होण्याची शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.

रेल्वेच्या पुणे विभागाने याबाबत इशारा दिला आहे. कोल्हापूर मार्गावरील कोल्हापूर मालधक्का ते रुकडी यादरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी या ठिकाणी पाण्याची पातळी ४८ फूट इतकी आहे. कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी पुलाजवळ वाढतच आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील. यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

महालक्ष्मी, कलबुर्गी सुटली
दरम्यान, शनिवारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कलबुर्गी एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांनी प्रवासी घेउन प्रयाण केले आहे. या दोन गाडया रुकडी येथील पंचगंगा नदीवरील पूलावरुन पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. रात्री उशिरा पुण्याकडे धावणारी विशेष रेल्वेसह ४.३० वाजता कोल्हापुरात येणारी हरिप्रिया एक्सप्रेस येणार की नाही हे समजल्यानंतरच इतर सर्व रेल्वे सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. जर पाणीपातळी वाढली तर पुढील आठवड्यात रेल्वेसेवा बंद राहणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkolhapurकोल्हापूर