भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांसह जल्लोष, मध्यरात्रीनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 01:12 IST2026-02-16T01:11:23+5:302026-02-16T01:12:52+5:30
हातात तिरंगा घेत तरुणाईने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषमय वातावरणामुळे चौकात उत्सवाचे स्वरूप आले होते. महिला, तरुणी तसेच लहान मुलेही तिरंगा फडकवत या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांसह जल्लोष, मध्यरात्रीनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त
कोल्हापूर : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. १८ व्या षटकात पाकिस्तानचा संघ ११४ धावांत गारद झाला. सामन्याचा निकाल लागताच शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हापुरकरांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला.
हातात तिरंगा घेत तरुणाईने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषमय वातावरणामुळे चौकात उत्सवाचे स्वरूप आले होते. महिला, तरुणी तसेच लहान मुलेही तिरंगा फडकवत या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मोबाईल कॅमेऱ्यावर काहींनी व्हिडिओ, रिल्स केले, तर काहींनी सेल्फी काढून आनंद साजरा केला.मोबाईल कॅमेऱ्यावर काहींनी व्हिडिओ, रिल्स केले, तर काहींनी सेल्फी काढून आनंद साजरा केला.
रविवारी रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. काही युवकांनी ध्वनीयंत्रणा (साउंड सिस्टीम) आणण्याचा प्रयत्न केला; मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी त्यास मनाई केली. तासभर या ठिकाणी एकच जल्लोष आणि आतषबाजी झाली. जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला. सुमारे तासभर या ठिकाणी एकच जल्लोष आणि आतषबाजी झाली. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली. भारताच्या या दमदार विजयामुळे कोल्हापूरकरांमध्ये उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले होते.
पोलिसांची अरेरावी -
बिंदू चौक आणि अयोध्या टॉकीजकडून महापालिका चौकात येण्यासाठी पोलिसांनी तुटपुंजे बॅरिकेडस लावले होते. त्यांच्या नजरेसमोरुन दुचाकीवरुन तिपल सीट जात असतानाही त्यांना ते हटकत नव्हते, मात्र इतरांवर अरेरावी करुन ट्रेझरी कार्यालयासमोरुन जाण्यास भाग पाडत होते.